शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

केवायसीच्या नावाखाली अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. जवळपास बहुतांश जणांकडे स्मार्ट फोन उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. जवळपास बहुतांश जणांकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहे. त्यातच बँक खातेदेखील मोबाईलमध्ये लिंक असल्याने सर्व व्यवहार चुटकीसरशी होतात. कॅशलेश व्यवहारांना कोरोना काळात मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. याच काळात अनेकांना केवायसीची मागणी करून डिजिटल भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दिसून आले.

डिजिटल भामट्यांकडून प्रथम तुमचा मोबाईल क्रमांक शोधून तुमच्याकडून गोड बोलून तुमचा बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डचा क्रमांक, मोबाईलवर आलेला ओटीपी मागवून घेतात. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या योजनेतून पैसे तुमच्या खात्यात जमा करायचे आहेत, असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जाते. या आमिषाला बळी पडून आपल्या बँक खात्याची, एटीएमची सर्व माहिती नागरिक देतात. यामध्ये महिलावर्गाला अधिक प्रमाणावर गंडविले जाते.

प्रकरण १

जालना शहरातील एका नामांकित बँकेचे एटीएम कार्ड असलेल्या नागरिकाकडून केवायसी मागवून त्याच्या खात्यातून जवळपास ७ लाख रुपये एका मिनिटात वर्ग करण्यात आले. याप्रकरणी संबंधित नागरिकाने जालना येथील सायबर सेलकडे तक्रार केली आहे. परंतु तीन महिने होऊनही या प्रकरणात पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे आपण ग्राहक मंचात धाव घेतल्याचे प्रसन्ना देशपांडे यांनी सांगितले.

प्रकरण २

अनेक नागरिकांकडे वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला जातो. यात प्रामुख्याने महिलाही संपर्क साधतात. जेणेकरून महिलांच्या बोलण्यावर अनेकजण आपली सर्व माहिती देतात आणि बळी पडतात. जालन्यातील एका शिक्षकाकडे त्याच्या खात्याचा सर्व तपशिल विचारण्यात आला. त्यानेदेखील सर्व माहिती देताच दुसऱ्या मिनिटाला त्याच्या खात्यातून रक्कम गेल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर शिक्षकाने दिली.

प्रकरण ३

मी जालना शहरातील असून, अनोळखी क्रमांकावरून मोबाईल आल्यानंतर प्रवासात असताना एटीएमसंदर्भातील सर्व माहिती देऊन मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला. आलेल्या क्रमांकावरून केंद्र सरकारच्या विविध योजनांतील रक्कम तुमच्या खात्यावर जमा करायची आहे, असे सांगितले. त्यामुळे आपण घाई गडबडीत ही माहिती दिली. यानंतर माझ्या खात्यातील जवळपास २२ हजार रुपये परस्पर काढले गेले.

बँकेकडून कधीच विचारणा होत नाही

डिजिटल युगामध्ये तेवढ्याच गतीने फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तुमची अधिकृत असलेली बँक ही तुम्हाला केवायसीबद्दल मोबाईलवरून कधीच माहिती विचारत नाही. त्यामुळे कोणीही अशी माहिती विचारल्यास ती न देता संबंधित क्रमांकाची माहिती पोलिसांना द्यावी.

जालना जिल्ह्यात डिजिटल फसवणुकीच्या तीसपेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. त्यातील आठ ते दहा जणांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना गेलेले पैसे परत केले आहेत. यापुढे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

- मारोती खेडकर,

पोलीस निरीक्षक सायबर सेल