शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात लसीकरणाच्या तीन दिवसांत चार टक्के डोस वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

जालना : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आजवर तीन वेळेस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरणावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी न लावल्याने काेरोनाचे ...

जालना : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आजवर तीन वेळेस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरणावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी न लावल्याने काेरोनाचे जवळपास सरासरी चार टक्के डोस वाया गेले आहेत.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. जालना जिल्हा रुग्णालय, अंबड उपजिल्हा रुग्णालय, परतूर व भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण केले जात आहे. तीन दिवसांत १२०० जणांना लसीकरणासाठी बोलाविण्यात आले होते. त्यात ७९७ जणांनी लसीकरणास हजेरी लावली; तर ४०३ जणांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. वाईल फोडल्यानंतर संबंधित व्यक्ती लसीकरणासाठी न आल्याने तीन दिवसांत जवळपास ५३ कोरोनाचे डोस वाया गेले आहेत.

एका बाटलीत १० डोस

लसीच्या एका बाटलीतून दहाजणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते; तसेच डोस भरतानाही काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वाया जातात.

घाबरू नका

कोरोनाची लस दिल्यानंतर ताप येणे, उलट्या-मळमळ होणे असे शारीरिक त्रास होतात. काहींना तापही येऊ शकतो.

लसीकरण कोणतेही असो; लसीकरण झाल्यानंतर वरील प्रकारचा त्रास होतो. त्यामुळे लसीकरणानंतर त्रास होण्याच्या विविध प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

४२२०० डोस मिळाले जिल्ह्याला

००५३ डोस गेले वाया

०७९७ जणांना तीन दिवसांत दिले डोस

०४०३ जण अनुपस्थित राहिले.