शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

...अखेर ग्रामस्थांना मिळाले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

परतूर : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ ...

परतूर : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यावर उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवार व शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, गावाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य पथकही दाखल झाले असून, ग्रामस्थांची तपासणी सुरू केली आहे.

तालुक्यातील बाबुलतारा गावात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला, शिवाय ५० जणांना कोरोनाची लागणही झाली आहे. त्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाढती रुग्णसंख्या व असलेली पाण्याची टंचाई, यामुळे ८० टक्के लोक शेतात राहण्यासाठी गेले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवार व शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गावात आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येकाची कोरोनाची चाचणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांना आंबा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीने पाइपलाइनची जोडणी करून पाणी सोडले, शिवाय गावात औषध फवारणीही करण्यात आली आहे.

बाबुलतारा या गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात औषधी फवारणी करण्यात आली आहे. आरोग्य पथकाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाग्रस्तांना आंबा येथील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

- अंकुश गुंजकर, गटविकास अधिकारी

बाबुलतारा १२०० लोकसंख्येचे गाव असून, आतापर्यंत २२५ लोकांची तपासणी करण्यात आली. त्रास असलेल्या लोकांची काळजी घेण्यात येत आहे.

- डॉ. सय्यद जाहेद, तालुका आरोग्य अधिकारी, परतूर