शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

अखेर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम : जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने ...

‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम :

जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. परंतु, प्रशासनाकडून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात नसल्याचे समोर आले होते. याबाबत ‘लोकमत’ने ३ एप्रिलच्या अंकात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर: पॉझिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणीकडे दुर्लक्ष’ या मथळाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज ४५० ते ५०० रुग्ण निघत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, नागरिक नियमांकडे कानाडोळा करत आहेत. दुसरीकडे प्रशासनाचाही हलगर्जीपणा दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात नाही. प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर पडल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी घेतलेल्या बैैठकीत जिल्हा प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी टोपे म्हणाले की, कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासीतांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील २० व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोनाबाधितांच्या सहवासीतांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.