शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या दरात वाढत होत नसल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकºयांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, ...

जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकºयांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, भावात अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकºयांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. परंतु, बहुतांश शेतकºयांना पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी व्यापाºयांना कापसाची बेभाव विक्री करत आहे.

भोकरदन तालुक्यात यंदा जूनच्या सुरूवातीपासूनच प्रर्जन्यमान चांगले राहिल्याने एक लाख तीन हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यात ४२ हजार ३०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. कपाशीला पाते व बोंड लागण्याच्या काळातच पाऊस झाल्याने पातेगळ झाली. त्यानंतर बोंडअळीचादेखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी औषध फवारणीवर मोठा खर्च करुन रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परतीच्या पावसाने कापूस घरात येण्याच्या काळातच थैमान घातल्याने उत्पादन घटले. पावसाच्या भीतीने बहुतांश शेतकºयांनी परजिल्ह्यातून मजूर आणून जास्तीची मजुरी देऊन कापूस वेचून घरी आणला. कापसाचे भाव वाढल्यास लागवडीवर झालेला खर्च निघेल, या आशेवर अनेक शेतकºयांनी घरात कापसाची साठवून केली. सुरूवातीला कापसाला ५४०० ते ५५०० रूपयापर्यंत भाव मिळाला होता. परंतु, त्यानंतर भावात घसरण झाली. सध्या ५ हजार २०० रूपये प्रति क्विंटल भाव आहे. भाव वाढत नसल्याने बहुतांश शेतकरी खासगी व्यापाºयाकडे कापसाची विक्री करीत आहे. परंतु, व्यापारी कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. मागील सहा वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. यंदा चांगले उत्पन्न झाल्याने शेतकºयांना चांगल्या उपन्नाची अपेक्षा होती. परंतु, अवेळी पडलेला पाऊस व भावात झालेली घसरण यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच अतिवृष्टीने अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

निसर्गाचे दृष्टचक्र शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक हतबल झाले आहे. दुसरीकडे बाजारपेठेत शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतीसाठी लागवड केलेला खर्चदेखील निघत नाही. सध्या व्यापारी कापूस कमी भावात मागत असल्याने ३० क्विंटल कापूस घरात पडून आहे. कापूस विकावा तरी संकट, नाही विकावा तरी संकट.

गणेश मुठ्ठे, शेतकरी.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कपाशीचे गठाण व सरकीलाच अपेक्षित भाव व मागणी नसल्याने कापसाचे दर कोसळले आहे. सध्या शेअर बाजारदेखील कोसळले आहे.

नरेश ताडे, कापूस व्यापारी

रविवारपर्यंत जिनिंग बंद

बहुतांश शेतकरी सीसीआय केंद्राकडे वळाले आहेत. सीसीआय केंद्रात आतापर्यंत एक लाख सोळा हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सध्या सीसीआय केंद्रात कापूस ठेवण्यास जागा नसल्याने रविवारपर्यंत जिनिंग बंद ठेवण्यात येणार आहे.

दादाराव दळवी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना.