शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

रामनगर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान जालना : तालुक्यातील रामनगर व परिसरात गत दोन दिवस दमदार पाऊस झाला. या ...

रामनगर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान

जालना : तालुक्यातील रामनगर व परिसरात गत दोन दिवस दमदार पाऊस झाला. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्याशिवाय फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

जाफराबाद येथे पोषण आहार पंधरवाडा

जाफराबाद : येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गंत जाफराबाद शहरातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पंधरवडा उपक्रमाची सुरूवात बुधवारी करण्यात आली. दरम्यान, पर्यवेक्षिका शारदा गोफणे यांनी बालकांना, गरोदर मातांना अंगणवाडी अंतर्गत देण्यात येत असलेल्या सकस आहाराबाबत माहिती दिली. यावेळी अंगणवाडी सेविका रेखा केदारे, कविता मंडलिक, पंचशिला पांडव, नसीमा पठाण, रत्नप्रभा मगरे, सुनीता सुरडकर, सुनीता गायकवाड आदींची उपस्थिती होती.

चंद्रसेन कोठावळे यांचा सत्कार

अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. चंद्रसेन कोठावळे यांची घनसावंगी येथील मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल पालकमंत्री राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्राचार्य डॉ. भागवत कटारे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गायकवाड, डॉ. राजेंद्र गायकवाड, अंबडचे प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे आदींनी स्वागत केले आहे.

पिंपळगाव परिसरात पिके बहरली

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. त्यातच बुधवारी सकाळपासूनच परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या हलक्या श्रावण सरी कोसळत होत्या. त्यामुळे परिसरातील वातावरण निसर्गरम्य होऊन वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

जालना : भोकरदन तालुक्यातील रामनगर येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे ही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील नागरिकांसह जनावरांनाही या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी

अंबड : शहरासह ग्रामीण भागात अनेक वाहन चालक अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. अनेक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.