शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

परतूर : आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र ...

परतूर : आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र खोलीत राहात आहेत. एकाच घरात राहून वेगळे राहण्याची वेळ आल्याने सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात दररोज ५०० पेक्षा अधिक रूग्ण निघत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना कोरोनाची भीती वाटत आहे. अशा परिस्थितही कोरोना रुग्णांवर डॉक्टर व कर्मचारी अहोरात्र उपचार करीत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता हे डॉक्टर, कर्मचारी काम करीत आहेत. तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी ते स्वतंत्र खोलीत राहतात. एकाच घरात राहून मुला-बाळांना जवळ घेता येत नसल्याचे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वत: तीन ते चार दिवसाला कोरोना चाचणी करीत असल्याचे ते म्हणाले.

मुलाबाळांची काळजी वाटते पण...

कोरोना काळ सुरू झाल्यापासून आमचे कुटुंबीय चिंतेत असते. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आम्ही वेगळ्या रूममध्ये राहतो. नियमित मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबी कराव्या लागतात. मुलाबाळांना जवळही घेता येत नाही.

डॉ. डी. आर. नवल, वैद्यकीय अधीक्षक

चौकट.

आम्ही कोविडच्या काळात रुग्णांची काळजी घेण्याबरोबरच कुटुंबियांची चिंता सतावते. घरी गेल्यानंतर बाहेरूनच बाथरूममध्ये आंघोळ करून, प्रत्येक रूममध्ये सॅनिटायझर ठेवून काळजी घेतो. तसेच प्रत्येक वेळी कोरोना टेस्ट करतो.

डॉ. जगन्नाथ मोरे, तालुका आरोग्य अधिकारी

कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाला स्वतंत्र खोली, सॅनिटायझर मास्क आदींचा वापर व सर्व नियम पाळूनही भीती वाटते.

स्मिता मोरे, पत्नी

कोविड सेंटरवर पीपीई कीटसह इतर साहित्याचा वापर करीत कुटुंबियांचीही काळजी घ्यावी लागते. घरी जातांना भीती वाटते. सर्व नियम पाळून प्रत्येकाला स्वंतत्र बेड व खोलीचा वापर करावा लागतो. एकाच घरात राहून वेगळे राहिल्यासारखे वाटते.

डॉ. महादेव उनउने, डॉक्टर

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. अशावेळी ते घरी आल्यानंतर अगोदर आंघोळ, कपडे बदलणे, सॅनिटायझर आदी बाबी करतात. परंतु, तरीही धाकधूक मनात असतेच. पूर्ण कुटुंबच धोक्यात येण्याची भीती असते. मुलाबाळांची काळजी वाटते. पण कर्तव्यही महत्त्वाचे आहे.

डॉ. वर्षा नवल, कुंटुबाची प्रतिक्रिया