शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

परतूर : आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र ...

परतूर : आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र खोलीत राहात आहेत. एकाच घरात राहून वेगळे राहण्याची वेळ आल्याने सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात दररोज ५०० पेक्षा अधिक रूग्ण निघत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना कोरोनाची भीती वाटत आहे. अशा परिस्थितही कोरोना रुग्णांवर डॉक्टर व कर्मचारी अहोरात्र उपचार करीत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता हे डॉक्टर, कर्मचारी काम करीत आहेत. तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी ते स्वतंत्र खोलीत राहतात. एकाच घरात राहून मुला-बाळांना जवळ घेता येत नसल्याचे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वत: तीन ते चार दिवसाला कोरोना चाचणी करीत असल्याचे ते म्हणाले.

मुलाबाळांची काळजी वाटते पण...

कोरोना काळ सुरू झाल्यापासून आमचे कुटुंबीय चिंतेत असते. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आम्ही वेगळ्या रूममध्ये राहतो. नियमित मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबी कराव्या लागतात. मुलाबाळांना जवळही घेता येत नाही.

डॉ. डी. आर. नवल, वैद्यकीय अधीक्षक

चौकट.

आम्ही कोविडच्या काळात रुग्णांची काळजी घेण्याबरोबरच कुटुंबियांची चिंता सतावते. घरी गेल्यानंतर बाहेरूनच बाथरूममध्ये आंघोळ करून, प्रत्येक रूममध्ये सॅनिटायझर ठेवून काळजी घेतो. तसेच प्रत्येक वेळी कोरोना टेस्ट करतो.

डॉ. जगन्नाथ मोरे, तालुका आरोग्य अधिकारी

कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाला स्वतंत्र खोली, सॅनिटायझर मास्क आदींचा वापर व सर्व नियम पाळूनही भीती वाटते.

स्मिता मोरे, पत्नी

कोविड सेंटरवर पीपीई कीटसह इतर साहित्याचा वापर करीत कुटुंबियांचीही काळजी घ्यावी लागते. घरी जातांना भीती वाटते. सर्व नियम पाळून प्रत्येकाला स्वंतत्र बेड व खोलीचा वापर करावा लागतो. एकाच घरात राहून वेगळे राहिल्यासारखे वाटते.

डॉ. महादेव उनउने, डॉक्टर

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. अशावेळी ते घरी आल्यानंतर अगोदर आंघोळ, कपडे बदलणे, सॅनिटायझर आदी बाबी करतात. परंतु, तरीही धाकधूक मनात असतेच. पूर्ण कुटुंबच धोक्यात येण्याची भीती असते. मुलाबाळांची काळजी वाटते. पण कर्तव्यही महत्त्वाचे आहे.

डॉ. वर्षा नवल, कुंटुबाची प्रतिक्रिया