शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

विहिरीत मुबलक पाणी तरीही मल्हारवाडीकरांना पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्हारवाडी येथील पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपासून ...

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्हारवाडी येथील पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपासून नादुरूस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.

मल्हारवाडी या गावात आदिवासी समाजातील ६० कुटुंबे वास्तव्यास आहे. या गावाला पाझर तलावातील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळावे, यासाठी येथे २०१० साली पाणीपुरवठा योजना करण्यात आली. त्यानंतर नळ योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु, मागील सहा महिन्यांपासून ही योजना नादुरूस्त झाली आहे. सध्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

या विहिरीची आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. तसेच विद्युत मोटारचे तारही तुटलेले दिसले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत ग्रामसेवक महेंद्र साबळे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, माहिती घेऊन सांगतो.

मागील काही दिवसांपासून मल्हारवाडी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेकवेळा पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

रमेश सपकाळ, नागरिक

===Photopath===

060321\06jan_14_06032021_15.jpg~060321\06jan_17_06032021_15.jpg

===Caption===

जळगाव सपकाळ~जळगाव सपकाळ