शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

विहिरीत मुबलक पाणी तरीही मल्हारवाडीकरांना पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्हारवाडी येथील पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपासून ...

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्हारवाडी येथील पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपासून नादुरूस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.

मल्हारवाडी या गावात आदिवासी समाजातील ६० कुटुंबे वास्तव्यास आहे. या गावाला पाझर तलावातील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळावे, यासाठी येथे २०१० साली पाणीपुरवठा योजना करण्यात आली. त्यानंतर नळ योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु, मागील सहा महिन्यांपासून ही योजना नादुरूस्त झाली आहे. सध्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

या विहिरीची आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. तसेच विद्युत मोटारचे तारही तुटलेले दिसले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत ग्रामसेवक महेंद्र साबळे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, माहिती घेऊन सांगतो.

मागील काही दिवसांपासून मल्हारवाडी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेकवेळा पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

रमेश सपकाळ, नागरिक

===Photopath===

060321\06jan_14_06032021_15.jpg~060321\06jan_17_06032021_15.jpg

===Caption===

जळगाव सपकाळ~जळगाव सपकाळ