शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

भरपावसाळ्यातही जाफराबादकर तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

जाफराबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणाच्या बाधित क्षेत्रातील विहिरीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. असे असतानाही ...

जाफराबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणाच्या बाधित क्षेत्रातील विहिरीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. असे असतानाही नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.

शहरातील आदर्शनगर, सिद्धार्थनगर, राजे संभाजीनगर, बालाजीनगर, श्रीकृष्णनगर, बाळाजीनगर या भागात गेल्या एक महिन्यापासून नळाला पाणी आले नाही. यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. कधी नळाला पाणी आलेच तर कमी दाबाने येते. त्यामुळे पूर्ण पाणी भरता येत नाही. अनियमित वेळी पाणी सोडण्यात येत असल्याने महिन्याभरापासून नागरिक हैराण झाले आहे. सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहे. कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जाफराबादला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. परंतु, नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना भरपावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पूजा दुधनाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शहराला पाणीपुरवठा करणारी निमखेडा बुद्रुक येथील विहीर तुडुंब भरलेली आहे. असे असतानाही गेल्या महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत आहे. नगरपंचायत सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे तर कधी विद्युतपंप जळाल्याचे कारण पुढे करीत आहेत. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपंचायतवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.

सुरेखा लहाने, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

नगरपंचायतीमध्ये नियोजनशून्य कारभार सुरू आहे. कोरोनाच्या नावाखाली अधिकारी जबाबदारी टाळत आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणी पाणी मिळाले त्यांनाही अशुद्ध पाणी मिळत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिंधू कैलास दिवटे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

सध्या नागरिकांना महिन्यातून एकवेळसुद्धा सुरळीत पाणी मिळत नाही. बहुतांश महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याचा परिणाम घरातील कामांवर होत आहे. भरपावसाळ्यात मिळेल तेवढे पाणी काटकसरीने वापरावे लागत आहे.

प्रभाकर कुदर, नागरिक

पाणीपुरवठा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वय नाही म्हणून दरवर्षी पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. पाण्याच्या अनियमित वेळा व कमी दाबाने येणारे पाणी यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

कौसर शेख, माजी नगरसेवक