शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

भरपावसाळ्यातही जाफराबादकर तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

जाफराबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणाच्या बाधित क्षेत्रातील विहिरीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. असे असतानाही ...

जाफराबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणाच्या बाधित क्षेत्रातील विहिरीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. असे असतानाही नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.

शहरातील आदर्शनगर, सिद्धार्थनगर, राजे संभाजीनगर, बालाजीनगर, श्रीकृष्णनगर, बाळाजीनगर या भागात गेल्या एक महिन्यापासून नळाला पाणी आले नाही. यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. कधी नळाला पाणी आलेच तर कमी दाबाने येते. त्यामुळे पूर्ण पाणी भरता येत नाही. अनियमित वेळी पाणी सोडण्यात येत असल्याने महिन्याभरापासून नागरिक हैराण झाले आहे. सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहे. कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जाफराबादला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. परंतु, नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना भरपावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पूजा दुधनाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शहराला पाणीपुरवठा करणारी निमखेडा बुद्रुक येथील विहीर तुडुंब भरलेली आहे. असे असतानाही गेल्या महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत आहे. नगरपंचायत सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे तर कधी विद्युतपंप जळाल्याचे कारण पुढे करीत आहेत. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपंचायतवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.

सुरेखा लहाने, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

नगरपंचायतीमध्ये नियोजनशून्य कारभार सुरू आहे. कोरोनाच्या नावाखाली अधिकारी जबाबदारी टाळत आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणी पाणी मिळाले त्यांनाही अशुद्ध पाणी मिळत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिंधू कैलास दिवटे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

सध्या नागरिकांना महिन्यातून एकवेळसुद्धा सुरळीत पाणी मिळत नाही. बहुतांश महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याचा परिणाम घरातील कामांवर होत आहे. भरपावसाळ्यात मिळेल तेवढे पाणी काटकसरीने वापरावे लागत आहे.

प्रभाकर कुदर, नागरिक

पाणीपुरवठा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वय नाही म्हणून दरवर्षी पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. पाण्याच्या अनियमित वेळा व कमी दाबाने येणारे पाणी यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

कौसर शेख, माजी नगरसेवक