शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यातही मिरची ४० रुपये, पालक १० रुपयांना पेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील बाजारातून येणाऱ्या भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वीच्या दराप्रमाणेच आहेत.

पावसाळ्यापूर्वी बहुतांश भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. पावसाचे आगमन आणि काही भागांतील पाण्याची उपलब्धता यामुळे मध्यंतरी भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात खालावले होते. परंतु, नंतर पावसाने दिलेली ओढ आणि उत्पादनात झालेली घट यामुळे शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या बहुतांश भाजीपाल्याचे दर उन्हाळ्यातील दराप्रमाणेच आहेत. काही भाजीपाल्यांचे दर कमी झाल्याचेही दिसून येत आहे.

नाशिकहून येतात टमाटा...

जालना येथील बाजारपेठेत नाशिक व परिसरातील टमाटा विक्रीसाठी येतात. शिवाय शेजारील बुलडाणा, परभणी, बीड जिल्ह्यातील शेतकरीही आपला माल जालना येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. शिवाय जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते.

गृहिणी म्हणतात...

कोरोनामुळे आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात भाजीपाल्याचे दरही अधिक वाढलेले आहेत. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडत असून, हे दर पाहता काही भाज्या घ्याव्या की नको? असा प्रश्न निर्माण होतो.

-संगीता वाघमारे

भाजीपाला असो किंवा इंधन असो वाढलेल्या दरवाढीचा आम्हा सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी होण्यासाठी केंद्र, राज्य शासनानेच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

- रागिणी राखे

व्यापारी म्हणतात....

बाजारपेठेत मालाची आवक कमी झाली आहे. त्यात बाहेरून येणाऱ्या मालाच्या खरेदीला अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बाजारपेठेत विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे दर अधिक वाटतात.

- प्रकाश शिंदे

ग्रामीण भागातून भाजीपाला खरेदी करून शहरात आणायचा म्हटलं की खर्च येतो. शिवाय साठवणुकीसह इतर बाबींवर खर्च होतो. मालाची आवक कमी असल्याने सध्या दर अधिक आहेत.

- हनुमान घाडगे