शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यातही मिरची ४० रुपये, पालक १० रुपयांना पेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील बाजारातून येणाऱ्या भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वीच्या दराप्रमाणेच आहेत.

पावसाळ्यापूर्वी बहुतांश भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. पावसाचे आगमन आणि काही भागांतील पाण्याची उपलब्धता यामुळे मध्यंतरी भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात खालावले होते. परंतु, नंतर पावसाने दिलेली ओढ आणि उत्पादनात झालेली घट यामुळे शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या बहुतांश भाजीपाल्याचे दर उन्हाळ्यातील दराप्रमाणेच आहेत. काही भाजीपाल्यांचे दर कमी झाल्याचेही दिसून येत आहे.

नाशिकहून येतात टमाटा...

जालना येथील बाजारपेठेत नाशिक व परिसरातील टमाटा विक्रीसाठी येतात. शिवाय शेजारील बुलडाणा, परभणी, बीड जिल्ह्यातील शेतकरीही आपला माल जालना येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. शिवाय जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते.

गृहिणी म्हणतात...

कोरोनामुळे आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात भाजीपाल्याचे दरही अधिक वाढलेले आहेत. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडत असून, हे दर पाहता काही भाज्या घ्याव्या की नको? असा प्रश्न निर्माण होतो.

-संगीता वाघमारे

भाजीपाला असो किंवा इंधन असो वाढलेल्या दरवाढीचा आम्हा सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी होण्यासाठी केंद्र, राज्य शासनानेच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

- रागिणी राखे

व्यापारी म्हणतात....

बाजारपेठेत मालाची आवक कमी झाली आहे. त्यात बाहेरून येणाऱ्या मालाच्या खरेदीला अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बाजारपेठेत विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे दर अधिक वाटतात.

- प्रकाश शिंदे

ग्रामीण भागातून भाजीपाला खरेदी करून शहरात आणायचा म्हटलं की खर्च येतो. शिवाय साठवणुकीसह इतर बाबींवर खर्च होतो. मालाची आवक कमी असल्याने सध्या दर अधिक आहेत.

- हनुमान घाडगे