शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भर पावसाळ्यातही मिरची ४० रुपये, पालक १० रुपयांना पेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील बाजारातून येणाऱ्या भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वीच्या दराप्रमाणेच आहेत.

पावसाळ्यापूर्वी बहुतांश भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. पावसाचे आगमन आणि काही भागांतील पाण्याची उपलब्धता यामुळे मध्यंतरी भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात खालावले होते. परंतु, नंतर पावसाने दिलेली ओढ आणि उत्पादनात झालेली घट यामुळे शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या बहुतांश भाजीपाल्याचे दर उन्हाळ्यातील दराप्रमाणेच आहेत. काही भाजीपाल्यांचे दर कमी झाल्याचेही दिसून येत आहे.

नाशिकहून येतात टमाटा...

जालना येथील बाजारपेठेत नाशिक व परिसरातील टमाटा विक्रीसाठी येतात. शिवाय शेजारील बुलडाणा, परभणी, बीड जिल्ह्यातील शेतकरीही आपला माल जालना येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. शिवाय जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते.

गृहिणी म्हणतात...

कोरोनामुळे आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात भाजीपाल्याचे दरही अधिक वाढलेले आहेत. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडत असून, हे दर पाहता काही भाज्या घ्याव्या की नको? असा प्रश्न निर्माण होतो.

-संगीता वाघमारे

भाजीपाला असो किंवा इंधन असो वाढलेल्या दरवाढीचा आम्हा सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी होण्यासाठी केंद्र, राज्य शासनानेच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

- रागिणी राखे

व्यापारी म्हणतात....

बाजारपेठेत मालाची आवक कमी झाली आहे. त्यात बाहेरून येणाऱ्या मालाच्या खरेदीला अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बाजारपेठेत विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे दर अधिक वाटतात.

- प्रकाश शिंदे

ग्रामीण भागातून भाजीपाला खरेदी करून शहरात आणायचा म्हटलं की खर्च येतो. शिवाय साठवणुकीसह इतर बाबींवर खर्च होतो. मालाची आवक कमी असल्याने सध्या दर अधिक आहेत.

- हनुमान घाडगे