शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कोरोना काळातही चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

देशासह राज्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तर रुग्णसंख्येत ...

देशासह राज्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तर रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात बहुतांश जण घरी राहूनच काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे वाटले होते. परंतु, तसे झाले नाही. २०१९ साली जिल्ह्यात ९७९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी २९९ उघडकीस आल्या आहेत. २०२० साली यात वाढ झाली. यावर्षी तब्बल १ हजार २१५ चोरीच्या घटना घडल्या. तर २०२१ साली म्हणेजच, मागील चार महिन्यांत ३४९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ९७ उघडकीस आल्या आहेत. मागील दोन्ही वर्षांच्या चोऱ्यांचा विचार केल्यास मागील चार महिन्यांत काही प्रमाणात तरी गुन्हेगारी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बलात्कारही वाढले

जिल्ह्यात इतर गुन्हे कमी झाले असले तरी बलात्कारच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. २०१९ साली जिल्ह्यात तब्बल ३९ बलात्कारच्या घटना घडल्या होत्या. २०२०मध्ये यात २० ने वाढ झाली आहे. या साली तब्बल ५९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तर मागील चार महिन्यांत १६ बलात्कारच्या घटना घडल्या आहेत.

खुनाच्या घटना वाढल्या

कोरोनाकाळात खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. २०१९ साली ३८ जणांचा खून झाला. २०२० मध्ये यात एकने घट झाली. २०२१ मध्ये चार महिन्यांतच १६ जणांचा खून झाला. त्यापैकी पोलिसांनी १५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर एक गुन्हा उघडकीस आला नाही. चार महिन्यांतच १६ खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या कोरोनात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्रामीण भागात दरोडा, घरफोड्या यासारख्या घटना घडत आहेत. दरोडेखोरांना पोलीस लवकरच जेरबंद करतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी व नियमांचे पालन करून सुरक्षित रहावे.

विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना

२०१९ मध्ये झालेल्या चोरीच्या घटना- ९७९

२०२० मध्ये झालेल्या चोरीच्या घटना- १२१५

एप्रिल २०२१ पर्यंत झालेल्या चोरीच्या घटना- ३४९