शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

चारचाकी लावण्यासाठी जागा पुरेना? घर, दुकानासमोरील पार्किंगमुळे अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

जालना : जालना शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढतच आहे. त्यातच अरूंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागत ...

जालना : जालना शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढतच आहे. त्यातच अरूंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने चारचाकी व दुचाकी वाहने लावण्यास जागा पुरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

जालना शहराची लोकसंख्या ४ लाख ०५ हजार आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ९७ हजार ५३१ वाहने आहेत. यात ३ लाख १९ हजार २९५ दुचाकी तर ७८ हजार २३६ चारचाकी वाहने आहेत. जालना शहरातील वाढलेल्या वाहनांची संख्या व अरूंद असलेले रस्ते यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अरूंद रस्त्यांमुळे चारचाकी व दुचाकी वाहने उभी करण्यास जागा पुरत नाही. काही वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला तर बहुतांश जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. त्यातच शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. रस्त्यावर वाहन उभे केल्यास २०० रुपये दंडाची तरतूद आहे.

....तर वाहन मालकावर कारवाई

ज्या वाहनधारकाने रस्त्यावर वाहन उभे केले आहे. त्यावरच कलम १२२ व १७७ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यांना २०० रुपये दंडाची तरतूद देखील आहे. तसेच भारतीय दंड विधान २८३ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.

नागरिकांनी रस्त्यावर वाहन उभे करू नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले आहे.

कचेरी रोड सर्वात त्रासदायक

जालना शहरातील कचेरी रोड महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरूनच शासकीय कार्यालयांसह इतरत्र जाता येते. परंतु, हा रस्ता अरूंद

आहे. त्यातच काही ठिकाणी वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.