शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-नाम’ तीन वर्षांपासून कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:05 IST

र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.

ठळक मुद्देजालना बाजार समिती : एमएसईपी अंतर्गत जालन्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार यापूर्वीच झाले आॅनलाईन पद्धतीने

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. असे असलेतरी जालना बाजार समितीने या पूर्वीच एमएसईपी अंतर्गत ई-नाम प्रणालीचाच एक भाग असलेला व्यवहार सर्व आॅनलाईन केला आहे. याला आता तीन वर्ष झाली आहेत.निर्मला सीतारामण यांच्या दिल्लीतील कृषी वित्त परिषदेमध्ये मार्गदर्शन करतांना बाजार समित्यांची कार्यपध्दती आणि कामकाज यावर गंभीर टिप्पणी केली. यामुळे जालना बाजार पेठेतही याचे पडसाद उमटले. यांसदर्भात जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर तसेच निवृत्त सचिव गणेश चौगुले यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना बाजार समितीने तत्कालीन कृषी आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या सुचनेनुसार एमएसईपी अंतर्गत आॅनलाईन व्यवहार सुरु केले होते.त्यात शेतकºयांनी आणलेल्या शेतमालाची नोंद आॅनलाईन घेण्याची पध्दती सुरु केलेली आहे. याअंतर्गत आजघडीला १ लाख ८० हजार शेतकºयांची नोंदणी झालेली आहे.जालना बाजार समितीने २०१६ मध्ये ही प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे या अर्थमंत्री सीतारामण यांच्या घोषणेचा जालन्यातील बाजार समिती तसेच आडत व्यापारी आणि शेतकºयांवर कुठलाच विपरीत परिणाम होणार नाही.ही प्रणाली २००९ मध्ये राबविण्याचे तत्कालीन आघाडी सरकारने जाहीर केले होते. या अंतर्गत जालन्यासह राज्यातील ४० पेक्षा अधिक बाजार समित्यांनी आपले व्यवहार आॅनलाईन केले आहेत. बाजार समित्या या शेतकरी आणि व्यापाºयांसाठी महत्वाची भूमिका निभावतात. शेतकºयांनी उत्पादीत केलेला माल विक्रीसाठी कुठे आणावा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच बाजार समित्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. आता या नवीन नियमामुळे बाजार समित्यांना आपले सर्व व्यवहार हे संगणकीकृत आॅनलाईन व्यवहाराव्दारे करावे लागणार आहे. शेतमालाची पारंपारिक पध्दती बंद होवून आता केंद्र सरकार राष्ट्रीय बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणू पाहत आहे. याचाच एक भाग म्हणून ई-नाम अर्थात इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

आम्ही काळाची गरज ओळखतोआजचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जात आहे. प्रत्येक गोष्ट डिजिटल होत चालली आहे. त्यामुळे जालना बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाने तत्कालीन कृषी आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ई-नाम समकक्ष एमएसईपी अंतर्गत आॅनलाईन व्यवहार सुरु केले होते. भविष्यात आणखी नवीन सूचना प्राप्त झाल्या तर त्याचीही आम्ही अंमलबजावणी करु.- अर्जुन खोतकर,सभापती तथा माजी राज्यमंत्री

टॅग्स :JalanaजालनाMarket Yardमार्केट यार्ड