शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे राजूर बसस्थानकात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

प्रवाशांनी फिरवली पाठ : एसटीला आर्थिक फटका राजूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले ...

प्रवाशांनी फिरवली पाठ : एसटीला आर्थिक फटका

राजूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. जिल्ह्यांतर्गत व परजिल्ह्यात चालू असलेली बससेवा बंद केल्याने एसटी महामंडळास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. प्रवासीही बसने प्रवास करणे टाळत आहेत. भोकरदन तालुक्यातील राजूर येथील बसस्थानक प्रवासी, विद्यार्थी व भाविकांनी नेहमीच गजबजलेले असते. परंतु, संचारबंदीमुळे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने बसस्थानकात शुकशुकाट दिसत आहे.

राजूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. प्रवाशांच्या सोयीनुसार बससेवाही सुरू आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिला एसटी बसेसने प्रवास करणे पसंत करतात. त्यासाठी महामंडळाने नांदेड, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, सोलापूर, लातूर, परळी, औरंगाबाद या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु केल्याने भाविकांना राजूरला येणे सहज शक्य होते. कोरोनामुळे बससेवा बंद झाल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. त्याचप्रमाणे नळणी, हसनाबाद-दाभाडी जवखेडा, निवडुंगा, आसरखेडा यासारख्या ग्रामीण भागातील बस बंद झाल्या आहेत. या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात व्यवसाय व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी राजूरला येतात. परंतु, लॉकडाऊनमुळे ही संख्या देखील कमी झाली आहे. राजूरमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असल्याने परिसरातील विद्यार्थी शाळा, महाविद्यालय व क्लासेसमध्ये शिक्षण घेतात. बसमध्ये पासची सवलत असल्याने विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरते. राजूरचे बसस्थानक नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेले असते. परंतु, सध्या कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थीही फिरकत नाही. बसस्थानक सुनसान वाटत आहे. संचारबंदीमुळे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने एसटीला आर्थिक फटका बसत आहे.

लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळत नसल्याने वाहतूक खर्चही वसूल होत नाही. २०-२५ प्रवासी असतील तरच बस बाहेर काढणे परवडते. सध्या प्रवासी घरीच आहेत. ग्रामीण व परजिल्ह्यातील बससेवा तूर्तास बंद आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू आहे.

व्ही. पी. पवार, वाहतूक नियंत्रक, राजूर