शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरु नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला होता. त्यातील ग्रामीण आणि शहरी अशा एकूण १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. ...

जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला होता. त्यातील ग्रामीण आणि शहरी अशा एकूण १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. या चार महिन्यात दोन लाख नागरिकांनी लस घेतली. परंतु ही लस घेताना मोठा गोंधळ उडाला आहे. ज्यांना पहिला डोस दिला, त्यांच्यासाठी दुसरा डोस राखून ठेवणे आवश्यक होते. परंतु तसे न करता जो येईल त्याला ही लस देत गेल्याने दुसरा डोस पुरविताना आता मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामुळे विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप होत आहे.

ग्रामीणमध्ये तर आता एक डोस घेतला आणि दुसरा मिळत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरी भागात मात्र, नागरिक सळो की पळो करून सोडत आहेत.

दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा

दुसरा डोस घेण्यासाठी सरासरी २८ दिवस थांबावे असे निकष होते. परंतु जास्तीत जास्त ४५ दिवस थांबता येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पहिला आणि दुसरा असे दोन डोस घेतल्यावर तुमच्या प्रतिकारशक्तीत मोठी वाढ होते. यामुळे कोरोना झाल्यावरही तो पाहिजे तेवढा हानिकारक ठरत नाही.

डोसला उशीर झाला तरी घाबरु नका

कोरोनावर ज्या दोन कंपन्यांच्या लसी बाजारात आहेत, त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु पहिला डोस घेतल्यानंतरची मुदत संपल्यावर चिंता व्यक्त होत आहे. परंतु तज्ज्ञ डॉ. संजय जगताप यांनी सांगितले की, २८ दिवस ही एक ढोबळ मुदत होती. परंतु साधारपणे पंधरा ते वीस दिवस उलटून गेल्यावरही घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.