शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

जन्मदरातील असमतोल : मुलीच्या मागण्या वाढल्याने वरपक्ष हैराण जालना : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हणून त्याकडे पाहिले ...

जन्मदरातील असमतोल : मुलीच्या मागण्या वाढल्याने वरपक्ष हैराण

जालना : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हणून त्याकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीत विवाह संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. परंतु, सध्या बदलत्या संस्कृतीमुळे आणि आधुनिकपणाच्या रेट्यामुळे ती संस्था धोक्यात आली की काय? एवढी गंभीर परिस्थिती शहर आणि ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, प्रसंगी परदेशातील नोकरीला युवतींकडून प्राधान्य दिले जात असल्याने या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी अशी आपल्याकडे एक म्हण वास्तव अर्थाने रूढ झाली आहे. शेती हा मानवी जीवनाचा कणा समजला जातो. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे यात उत्पन्नाचा भरवसा नसल्याने शेती क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यातूनच उच्च शिक्षण घेऊन अनेक खेड्यांमधील युवक-युवती या पुणे, मुंबई यासह अन्य मोठ्या शहराकडे आकर्षिले जात आहे. तेथील चकाचक संस्कृती, जीवनशैली, सोयी-सुविधा याकडे तेथेच स्थायिक होण्याचा विचार वाढत आहे.

या विचारसरणीमुळे काळ्या मातीत राबणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांच्या विवाहाचा मोठा प्रश्न समाज व्यवस्थेसमोर निर्माण झाल्याचे वास्तव आहे.

अटी मान्य असतील तरच बोला...

समाजातील मुला-मुलींच्या जन्मदराचे गुणोत्तर सध्या बिघडले आहे. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास एक हजार मुलामागे ९२० मुलींची संख्या आहे. त्यामुळे समाजासमोर विवाह जुळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासर्व अडचणी लक्षात घेऊन आणि भविष्याची चिंता व्यक्त करत मुली तसेच मुलींच्या आई-वडिलांकडून आता वर पक्षासाठी अनेक अटी घातल्या जात आहे. त्या पूर्ण करताना वर पक्ष नाकीनव येत आहे. काही दशकांपूर्वी याच अटी शर्ती वर पक्षाकडून घातल्या जात होत्या. त्यामुळे अडचणी वाढत होत्या.

सर्वाधिक मागणी डॉक्टरांना

n डॉक्टर, इंजिनियर यांसह अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांच्या तुलनेत डॉक्टर आणि इंजिनियर यांना मुली तसेच आई-वडिलांकडून मागणी वाढत आहे.

n मोठ्या शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने डॉक्टर आणि इंजिनियर यांच्यासह अन्य व्यावसायिकांकडे मुलींचा ओढा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

n मध्यंतरीच्या काळात काही घटनांमधून आर्थिक चणचण, मुलींकडच्यांची आर्थिक लूट, अन्याय यामुळेदेखील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील युवकांना पसंती दिली जात आहे.

पूर्वी ओळखीच्या आणि नातेवाइकांच्या मध्यस्तीने विवाह सोहळे पार पडत असत. परंतु आता विवाहसंस्था या विवाह जमविण्यासाठी महत्त्वाचा आणि खात्रीशीर घटक ठरत आहे.

-उषा देशपांडे,

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

एकूणच युवक-युवतींची आवड-निवड पूर्वीसारखी राहिली नसून, प्रत्यक्ष भेटणे आता शक्य नसल्याने सोशल मीडियावरूनच अनेकाचे विवाह जुळत आहेत. याला आता मान्यता मिळाली आहे.

- दक्षा लोदवाल

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

विवाह संस्थाच्या माध्यमातून खात्रीशीर स्थळ वधू आणि वरपित्यांना उपलब्ध होत आहे. त्यातून अनेकांना विवाह जुळविताना येणाऱ्या अडचणी दूर होत असल्याने या संस्थानचे महत्त्व वाढले आहे.

-दीपक रणनवरे

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

मुलगा काय करतो, याची विचारणा केल्यावर तो नोकरीस नसेल असे समजल्यावर फारसे स्थळ येत नाहीत. शेती कितीही आधुनिक असली तरी विवाह जुळविताना अडचणी येतात.

- वरपित्याचा कोट,

मुलींचे लग्न जुळविताना आई-वडिलांकडून सर्व ती खबरदारी घेतली जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये मनस्ताप होतो. शेती करणाऱ्या युवकांचा त्रास यात आणखी वेगळा असतो.

-वधूपित्याचा कोट,