शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

जन्मदरातील असमतोल : मुलीच्या मागण्या वाढल्याने वरपक्ष हैराण जालना : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हणून त्याकडे पाहिले ...

जन्मदरातील असमतोल : मुलीच्या मागण्या वाढल्याने वरपक्ष हैराण

जालना : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हणून त्याकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीत विवाह संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. परंतु, सध्या बदलत्या संस्कृतीमुळे आणि आधुनिकपणाच्या रेट्यामुळे ती संस्था धोक्यात आली की काय? एवढी गंभीर परिस्थिती शहर आणि ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, प्रसंगी परदेशातील नोकरीला युवतींकडून प्राधान्य दिले जात असल्याने या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी अशी आपल्याकडे एक म्हण वास्तव अर्थाने रूढ झाली आहे. शेती हा मानवी जीवनाचा कणा समजला जातो. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे यात उत्पन्नाचा भरवसा नसल्याने शेती क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यातूनच उच्च शिक्षण घेऊन अनेक खेड्यांमधील युवक-युवती या पुणे, मुंबई यासह अन्य मोठ्या शहराकडे आकर्षिले जात आहे. तेथील चकाचक संस्कृती, जीवनशैली, सोयी-सुविधा याकडे तेथेच स्थायिक होण्याचा विचार वाढत आहे.

या विचारसरणीमुळे काळ्या मातीत राबणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांच्या विवाहाचा मोठा प्रश्न समाज व्यवस्थेसमोर निर्माण झाल्याचे वास्तव आहे.

अटी मान्य असतील तरच बोला...

समाजातील मुला-मुलींच्या जन्मदराचे गुणोत्तर सध्या बिघडले आहे. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास एक हजार मुलामागे ९२० मुलींची संख्या आहे. त्यामुळे समाजासमोर विवाह जुळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासर्व अडचणी लक्षात घेऊन आणि भविष्याची चिंता व्यक्त करत मुली तसेच मुलींच्या आई-वडिलांकडून आता वर पक्षासाठी अनेक अटी घातल्या जात आहे. त्या पूर्ण करताना वर पक्ष नाकीनव येत आहे. काही दशकांपूर्वी याच अटी शर्ती वर पक्षाकडून घातल्या जात होत्या. त्यामुळे अडचणी वाढत होत्या.

सर्वाधिक मागणी डॉक्टरांना

n डॉक्टर, इंजिनियर यांसह अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांच्या तुलनेत डॉक्टर आणि इंजिनियर यांना मुली तसेच आई-वडिलांकडून मागणी वाढत आहे.

n मोठ्या शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने डॉक्टर आणि इंजिनियर यांच्यासह अन्य व्यावसायिकांकडे मुलींचा ओढा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

n मध्यंतरीच्या काळात काही घटनांमधून आर्थिक चणचण, मुलींकडच्यांची आर्थिक लूट, अन्याय यामुळेदेखील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील युवकांना पसंती दिली जात आहे.

पूर्वी ओळखीच्या आणि नातेवाइकांच्या मध्यस्तीने विवाह सोहळे पार पडत असत. परंतु आता विवाहसंस्था या विवाह जमविण्यासाठी महत्त्वाचा आणि खात्रीशीर घटक ठरत आहे.

-उषा देशपांडे,

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

एकूणच युवक-युवतींची आवड-निवड पूर्वीसारखी राहिली नसून, प्रत्यक्ष भेटणे आता शक्य नसल्याने सोशल मीडियावरूनच अनेकाचे विवाह जुळत आहेत. याला आता मान्यता मिळाली आहे.

- दक्षा लोदवाल

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

विवाह संस्थाच्या माध्यमातून खात्रीशीर स्थळ वधू आणि वरपित्यांना उपलब्ध होत आहे. त्यातून अनेकांना विवाह जुळविताना येणाऱ्या अडचणी दूर होत असल्याने या संस्थानचे महत्त्व वाढले आहे.

-दीपक रणनवरे

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

मुलगा काय करतो, याची विचारणा केल्यावर तो नोकरीस नसेल असे समजल्यावर फारसे स्थळ येत नाहीत. शेती कितीही आधुनिक असली तरी विवाह जुळविताना अडचणी येतात.

- वरपित्याचा कोट,

मुलींचे लग्न जुळविताना आई-वडिलांकडून सर्व ती खबरदारी घेतली जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये मनस्ताप होतो. शेती करणाऱ्या युवकांचा त्रास यात आणखी वेगळा असतो.

-वधूपित्याचा कोट,