शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

जालना : मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर रोगराई पडली आहे. यावर ...

जालना : मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर रोगराई पडली आहे. यावर फवारणी करण्यासह इतर कामांसाठी अंबड तालुक्यातील रोहिलागड, खेडगाव, निहालसिंगवाडी, चिकनगाव परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. हेच चित्र मंठा तालुक्यातही असल्याचे दिसून आले.

मागील तीन ते चार वर्षात गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांची आशा रबी पिकांवर होती. सध्या अनेक गावांमध्ये रबी पिकेही चांगली आली आहेत; परंतु अनेक गावांमध्ये तूर काढणीसह मोसंबी आळ्यांची टाचणी करणे, गहू पिकाला पाणी देणे, डाळिंब छाटणी करून बागेतील कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. यातच काही गावांमधील मजूर ऊसतोडणीसाठी गेले आहेत. असे असतानाच यंदा रबी पिकांचा पेराही गावोगाव वाढला आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील किनगाव, कवचलवाडी यांसह इतर काही गावांमध्ये मागणीच्या तुलनेत मजुरांची टंचाई जाणवत आहे.

काय म्हणतात गावोगावचे शेतकरी

रोहिलागड परिसरातील काही मजूर शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामावर जातात. याचा परिणाम गावात मजूर मिळण्यावर होत आहे. मजूरांकडून करून घेणारी कामे घरीच कुटुंबीयातील सदस्यांकडून करून घेतली जातात, अशी माहिती रोहिलागड येथील कल्याण टकले यांनी दिली.

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात खरीप हंगामातील कापूस वेचणीसाठी मजुरांची अधिक टंचाई जाणवते. अशा वेळी आम्ही विदर्भातून मजुरांची कापूस वेचणीसाठी ने-आण करतो, इतर वेळी मजुरांची टंचाई जाणवत नाही, अशी माहिती टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे दिली आहे.

शेतीतील कामे अंगमेहनतीची असतात. त्यामुळे काही प्रमाणात मजूर शेतीची कामे करण्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या गावात सध्या गहू, हरभरा खुरपणीची कामे सुरू आहेत. ही कामे गाव परिसरात सुरू असल्याने मजुरांची सद्यस्थितीत टंचाई जाणवत आहे, अशी माहिती बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील अचितराव देशमुख यांनी दिली.

यंत्राने होणारी कामे

पूर्वी होणाऱ्या बैलशेतीचा उपयोग आता ट्रॅक्टर शेतीत झाला आहे. यासोबतच फळपिकांवर फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जात आहे.

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

लागवड केलेल्या उसाची सरी फोडण्यासाठी छोट्या ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास औषधांची फवारणी करून गवत जाळले जाते, तसेच अनेक गावांमध्ये पिकांना ठिबकद्वारे पाणी दिले जात आहे. एकूणच कृषी यंत्रामुळे अंगमेहनतीची कामे आता राहिली नाहीत.