शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

जालना : मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर रोगराई पडली आहे. यावर ...

जालना : मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर रोगराई पडली आहे. यावर फवारणी करण्यासह इतर कामांसाठी अंबड तालुक्यातील रोहिलागड, खेडगाव, निहालसिंगवाडी, चिकनगाव परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. हेच चित्र मंठा तालुक्यातही असल्याचे दिसून आले.

मागील तीन ते चार वर्षात गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांची आशा रबी पिकांवर होती. सध्या अनेक गावांमध्ये रबी पिकेही चांगली आली आहेत; परंतु अनेक गावांमध्ये तूर काढणीसह मोसंबी आळ्यांची टाचणी करणे, गहू पिकाला पाणी देणे, डाळिंब छाटणी करून बागेतील कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. यातच काही गावांमधील मजूर ऊसतोडणीसाठी गेले आहेत. असे असतानाच यंदा रबी पिकांचा पेराही गावोगाव वाढला आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील किनगाव, कवचलवाडी यांसह इतर काही गावांमध्ये मागणीच्या तुलनेत मजुरांची टंचाई जाणवत आहे.

काय म्हणतात गावोगावचे शेतकरी

रोहिलागड परिसरातील काही मजूर शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामावर जातात. याचा परिणाम गावात मजूर मिळण्यावर होत आहे. मजूरांकडून करून घेणारी कामे घरीच कुटुंबीयातील सदस्यांकडून करून घेतली जातात, अशी माहिती रोहिलागड येथील कल्याण टकले यांनी दिली.

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात खरीप हंगामातील कापूस वेचणीसाठी मजुरांची अधिक टंचाई जाणवते. अशा वेळी आम्ही विदर्भातून मजुरांची कापूस वेचणीसाठी ने-आण करतो, इतर वेळी मजुरांची टंचाई जाणवत नाही, अशी माहिती टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे दिली आहे.

शेतीतील कामे अंगमेहनतीची असतात. त्यामुळे काही प्रमाणात मजूर शेतीची कामे करण्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या गावात सध्या गहू, हरभरा खुरपणीची कामे सुरू आहेत. ही कामे गाव परिसरात सुरू असल्याने मजुरांची सद्यस्थितीत टंचाई जाणवत आहे, अशी माहिती बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील अचितराव देशमुख यांनी दिली.

यंत्राने होणारी कामे

पूर्वी होणाऱ्या बैलशेतीचा उपयोग आता ट्रॅक्टर शेतीत झाला आहे. यासोबतच फळपिकांवर फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जात आहे.

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

लागवड केलेल्या उसाची सरी फोडण्यासाठी छोट्या ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास औषधांची फवारणी करून गवत जाळले जाते, तसेच अनेक गावांमध्ये पिकांना ठिबकद्वारे पाणी दिले जात आहे. एकूणच कृषी यंत्रामुळे अंगमेहनतीची कामे आता राहिली नाहीत.