शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ? १३२० जागांसाठी १४५० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

जालना : विविध क्षेत्रांत वाढलेली स्पर्धा शिक्षण क्षेत्रातही नवीन नाही. त्यात उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या ...

जालना : विविध क्षेत्रांत वाढलेली स्पर्धा शिक्षण क्षेत्रातही नवीन नाही. त्यात उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. परिणामी जिल्ह्यातील युुवक आता रोजगाराभिमुख शिक्षणाकडे वळू लागले आहेत.

जिल्ह्यात पॉलिटेक्निकचे पाच महाविद्यालये असून, त्यात १३२० जागा मंजूर आहेत. या १३२० जागांसाठी जवळपास १४५० मुलांनी अर्ज दाखल केले होते. प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. जवळपास ८०० वर मुलांनी कागदपत्रे संबंधित महाविद्यालयांमध्ये जमा केली आहेत. रोजगाराभिमुख शिक्षणासाठी शासकीय महाविद्यालयासह खासगी महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी प्रयत्न करताना दिसत आहेत.

संगणक इलेक्ट्रिककडे विद्यार्थ्यांचा ओढा

आजचे युग हे संगणकाचे युग आहे. त्यामुळे अनेक मुलांनी संगणकासह इलेक्ट्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो.

म्हणून पॉलिटेक्निकला पसंती

अनेक शासकीय विभागातील नाेकर भरती वेळेवर होत नाही. जेथे भरती होते तेथेही कंत्राटी भरती होते. त्यामुळे ती नाेकरी कायम राहील याची आशा नसते. त्यात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही अनेक मुलं बेरोजगार आहेत. त्यामुळेच आज अनेक मुलं रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत आहेत.

- अनिकेत राजपूत, विद्यार्थी

शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढली असून, अनेकांना उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही; परंतु पॉलिटेक्निकसह इतर रोजगाराभिमुख शिक्षण घेतले तर भविष्यात स्वत:चा व्यवसाय करता येतो. त्यामुळे आज अनेक मुलं पॉलिटेक्निकसह इतर रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ लागले आहेत.

- राजरत्न सरवदे, विद्यार्थी

प्राचार्य म्हणतात...

गत काही वर्षांपासून पॉलिटेक्निकमधील विविध विभागात प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. सध्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच दुसरा टप्पाही पूर्ण केला जाणार आहे.

- प्रशांत पट्टलवार, प्राचार्य

कोरोनामुळे नोकऱ्या गेलेल्या युवकांना इतर काम करताना अडचणी येत आहेत. त्यात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून शिक्षण घेतलेली मुलं स्वत:चा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निककडे मुलांचा ओढा वाढला आहे.

- ए. एम. जिंतूरकर, प्राचार्य