शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विस्कळीत इंटरनेट सेवेमुळे दस्त नोंदणीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST

(फोटो) देऊळगाव राजा : येथील दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक एक कार्यालयातील इंटरनेट सेवा सतत विस्कळीत होत आहे. विस्कळीत सेवेमुळे ...

(फोटो)

देऊळगाव राजा : येथील दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक एक कार्यालयातील इंटरनेट सेवा सतत विस्कळीत होत आहे. विस्कळीत सेवेमुळे येथे खरेदी- विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या शेतकरी, नागरिकांना अनेक तास इंटरनेट सेवा सुरळीत होण्याची वाट पाहत थांबावे लागत आहे. विस्कळीत इंटरनेट सेवेचा इतर शासकीय कार्यालयाच्या कामकाजावरही परिणाम होत आहे.

देऊळगाव राजा येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात जमिनीच्या खरेदीखत व नोंदणीसाठी दररोज शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व खरेदीदार नागरिक येतात. दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ऑनलाईन चालतो. त्यामुळे इंटरनेट शिवाय कामे मार्गी लागत नाहीत. या कार्यालयासह शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार बीएसएनएल ब्रॉडबँड सुविधेवर अवलंबून आहेत. मात्र बीएसएनएलची ब्रॉडबँड सुविधा वारंवार कोलमडत आहे. ही सेवा सतत विस्कळीत होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयासह बँका व इतर शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. अनेक शेतकरी, नागरिक हे ४० ते ५० किलोमीटर दूर अंतरावरून या कार्यालयात खरेदी- विक्रीच्या नोंदीसाठी येतात. इंटरनेट नसल्याने दिवसभर कार्यालयात थांबून रहावे लागते. इंटरनेट सुरू झाले नाही तर परत गावी जाऊन दुसऱ्या दिवशी यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय होणारा मानसिक त्रास हा वेगळाच आहे.

समृध्दी महामार्गाच्या खोदकामासह इतर कामांसाठी केलेल्या खोदकामामुळे बीएसएनएलच्या वायरिंग तुटलेल्या आहेत. त्यामुळे तेथे सतत अडचणी निर्माण होत आहेत. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कधी कधी दोन ते तीन दिवसही लागतात. या कालावधीत नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन पर्यायी खाजगी इंटरनेट सेवा वापरावी, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठांकडे पाठपुरावा

आमची सर्व कामे ऑनलाईन चालतात. इंटरनेट सेवा विस्कळीत असेल तर कामे ठप्प होतात. त्यामुळे आम्ही आता खाजगी इंटरनेट सेवा वापरण्यास मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत आहोत.

एच. एम. मिर्झा

दुय्यम निबंधक, देऊळगाव राजा

पर्यायी सेवा वापरावी

दुुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे दस्त नोंदणीचे कामकाज बंद पडत असून, नागरिकांना अनेक तास कार्यालयात थांबावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी खाजगी इंटरनेट सेवेचा पर्याय वापरणे गरजेचे आहे.

गोविंद वायाळ

माजी सरपंच, चिंचखेडा