शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

स्वतंत्र विदर्भाच्या धोरणाला माकपचा विरोध

By admin | Updated: October 9, 2014 00:36 IST

जालना : महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु या धोरणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विरोध असून जनतेत फूट पाडून राजकारण करण्याचा भाजपाचा डाव जनतेने

जालना : महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु या धोरणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विरोध असून जनतेत फूट पाडून राजकारण करण्याचा भाजपाचा डाव जनतेने उलथवून टाकून माकपच्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहन पक्षाच्या केंद्रीय नेत्या माजी खासदार सुभाषिनी अली यांनी केले. काँग्रेस, भाजपा, राकाँ व शिवसेना हे चारही पक्ष सारखेच असल्याचा आरोप त्यांनी केला.परतूर विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार मारोती खंदारे यांच्या प्रचार सभेत अली बोलत होत्या. आपल्या भाषणात अली पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारने पहिल्या शंभर दिवसातच आपला पोकळपणा सिद्ध केला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मोदींनी आश्वासनांची खैरातबाजी केली. परंतु प्रत्यक्षात सरकार आल्यानंतर शंभर दिवसात काहीच केले नाही. याउलट महागाई वाढली, भारतीय सीमेवर पाकच्या सैन्याकडून गोळीबार सुरू असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा, सेना हे चारही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या पक्षांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे सांगून मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी माकपच्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहन अली यांनी केले.सभेच्या अध्यक्षस्थानी अण्णा सावंत होते. यावेळी उमेदवार मारोती खंदारे, मधुकर मोकळे, सरिता शर्मा, गोविंद आर्दड, कांता मिटकरी, नंदकिशोर प्रधान आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)