शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या ...

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे खर्चासाठी पैसे नसल्याने व इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती व उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे अनेक जण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक यासह इतर राज्यांत कामाला गेले होते. परंतु, मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. यामुळे बहुतांश कंपन्यांनी कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे बाहेरगावी गेलेले सर्वच जण आपल्या गावी परतले. यामुळे अनेकांची सामाजिक, आर्थिक स्थितीदेखील बिघडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण झाले होते. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पत्नीला मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणे, पैसे नसल्याने महिलेस मारहाण करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. टोकाचे वाद झाल्यानंतर महिला तक्रार, महिला व मुलांकरिता साहाय्य कक्ष असलेल्या या विभागात तक्रारी येतात. या ठिकाणी पती-पत्नी तसेच कुटुंबाची समजूत काढून तडजोड केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा सुरू होतात, तर काहींचे दुभंगतात. मात्र, वाढत असलेली प्रकरणे चिंतेचा विषय बनत आहेत. गतवर्षात महिला तक्रार निवारण कक्षाकडे तब्बल ५६९ प्रकरणे दाखल झाली होती. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. १७ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली.

या कारणांमुळे होतात तक्रारी

घरखर्च भागविण्यासाठी पैसे नसल्याने महिलेस मारहाण करून माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. मुलगा होत नाही. तसेच दुचाकी, घर खरेदी करण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली जाते.

१४३ प्रकरणांत तडजोड

जालना येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे मागील वर्षभरात ५६९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. तर, ९३ प्रकरणे पोलीस ठाण्यात गेली. त्याचबरोबर १७ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. २१८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील दोन महिन्यांत १२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.