शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या ...

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे खर्चासाठी पैसे नसल्याने व इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती व उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे अनेक जण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक यासह इतर राज्यांत कामाला गेले होते. परंतु, मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. यामुळे बहुतांश कंपन्यांनी कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे बाहेरगावी गेलेले सर्वच जण आपल्या गावी परतले. यामुळे अनेकांची सामाजिक, आर्थिक स्थितीदेखील बिघडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण झाले होते. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पत्नीला मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणे, पैसे नसल्याने महिलेस मारहाण करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. टोकाचे वाद झाल्यानंतर महिला तक्रार, महिला व मुलांकरिता साहाय्य कक्ष असलेल्या या विभागात तक्रारी येतात. या ठिकाणी पती-पत्नी तसेच कुटुंबाची समजूत काढून तडजोड केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा सुरू होतात, तर काहींचे दुभंगतात. मात्र, वाढत असलेली प्रकरणे चिंतेचा विषय बनत आहेत. गतवर्षात महिला तक्रार निवारण कक्षाकडे तब्बल ५६९ प्रकरणे दाखल झाली होती. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. १७ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली.

या कारणांमुळे होतात तक्रारी

घरखर्च भागविण्यासाठी पैसे नसल्याने महिलेस मारहाण करून माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. मुलगा होत नाही. तसेच दुचाकी, घर खरेदी करण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली जाते.

१४३ प्रकरणांत तडजोड

जालना येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे मागील वर्षभरात ५६९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. तर, ९३ प्रकरणे पोलीस ठाण्यात गेली. त्याचबरोबर १७ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. २१८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील दोन महिन्यांत १२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.