शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या ...

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे खर्चासाठी पैसे नसल्याने व इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती व उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे अनेक जण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक यासह इतर राज्यांत कामाला गेले होते. परंतु, मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. यामुळे बहुतांश कंपन्यांनी कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे बाहेरगावी गेलेले सर्वच जण आपल्या गावी परतले. यामुळे अनेकांची सामाजिक, आर्थिक स्थितीदेखील बिघडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण झाले होते. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पत्नीला मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणे, पैसे नसल्याने महिलेस मारहाण करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. टोकाचे वाद झाल्यानंतर महिला तक्रार, महिला व मुलांकरिता साहाय्य कक्ष असलेल्या या विभागात तक्रारी येतात. या ठिकाणी पती-पत्नी तसेच कुटुंबाची समजूत काढून तडजोड केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा सुरू होतात, तर काहींचे दुभंगतात. मात्र, वाढत असलेली प्रकरणे चिंतेचा विषय बनत आहेत. गतवर्षात महिला तक्रार निवारण कक्षाकडे तब्बल ५६९ प्रकरणे दाखल झाली होती. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. १७ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली.

या कारणांमुळे होतात तक्रारी

घरखर्च भागविण्यासाठी पैसे नसल्याने महिलेस मारहाण करून माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. मुलगा होत नाही. तसेच दुचाकी, घर खरेदी करण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली जाते.

१४३ प्रकरणांत तडजोड

जालना येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे मागील वर्षभरात ५६९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. तर, ९३ प्रकरणे पोलीस ठाण्यात गेली. त्याचबरोबर १७ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. २१८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील दोन महिन्यांत १२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.