शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या ...

जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे खर्चासाठी पैसे नसल्याने व इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती व उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे अनेक जण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक यासह इतर राज्यांत कामाला गेले होते. परंतु, मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. यामुळे बहुतांश कंपन्यांनी कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे बाहेरगावी गेलेले सर्वच जण आपल्या गावी परतले. यामुळे अनेकांची सामाजिक, आर्थिक स्थितीदेखील बिघडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण झाले होते. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पत्नीला मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणे, पैसे नसल्याने महिलेस मारहाण करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. टोकाचे वाद झाल्यानंतर महिला तक्रार, महिला व मुलांकरिता साहाय्य कक्ष असलेल्या या विभागात तक्रारी येतात. या ठिकाणी पती-पत्नी तसेच कुटुंबाची समजूत काढून तडजोड केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा सुरू होतात, तर काहींचे दुभंगतात. मात्र, वाढत असलेली प्रकरणे चिंतेचा विषय बनत आहेत. गतवर्षात महिला तक्रार निवारण कक्षाकडे तब्बल ५६९ प्रकरणे दाखल झाली होती. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. १७ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली.

या कारणांमुळे होतात तक्रारी

घरखर्च भागविण्यासाठी पैसे नसल्याने महिलेस मारहाण करून माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. मुलगा होत नाही. तसेच दुचाकी, घर खरेदी करण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली जाते.

१४३ प्रकरणांत तडजोड

जालना येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे मागील वर्षभरात ५६९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. तर, ९३ प्रकरणे पोलीस ठाण्यात गेली. त्याचबरोबर १७ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. २१८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील दोन महिन्यांत १२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.