शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

जालना : कोरोनाच्या आजाराने जिवंतपणी छळले जाते... हे मान्य आहे, परंतु कोरोनावर उपचार सुरू असताना जर कितीही प्रिय व्यक्तीचा ...

जालना : कोरोनाच्या आजाराने जिवंतपणी छळले जाते... हे मान्य आहे, परंतु कोरोनावर उपचार सुरू असताना जर कितीही प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इच्छा असूनही अनेकांना अंत्यसंस्कार विधिवत करता येत नाहीत. तर काही प्रकरणांमध्ये मात्र वेगळे अनुभव असून, रक्ताची नातीही पाणी देण्यासाठी पुढे येत नसल्याचे वास्तव अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाचा कहर सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात जवळपास ४६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात कोरोनावर ३७ हजार जणांनी मात केली आहे. कोरोनामुळेच केवळ मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे खूप नगण्य आहे. अन्य आजार असल्याने देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह ही कारणे आहेत. हे मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईक हजर असतात. परंतु ते अंत्यसंस्काराच्यावेळी बाहेरच राहून आम्हालाच अंत्यसंस्कार करण्यात सांगत असल्याचे दिसून आले.

शहरात मृत्यू वाढले

जालना शहरात मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. जवळपास वर्षभरात कोरोनाने ३६५ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यात जालना शहरच कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता.

५ माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही

मागील काही महिन्यांमध्ये जालन्यातील गांधीनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षभरात ३४५ पेक्षा अधिक मृतदेहांवर जालना पालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले आहेत. यावेळी जवळपास १५ पेक्षा अधिक नातेवाईकांनी मृतदेहाला पाणी पाजण्यासाठी देखील पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे अशा मृतदेहांवर आम्हीच शक्य तेवढे रितीरिवाज पाळून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेकजण हे स्मशानभूमीपासून शंभर फूट दूर राहूनच मृतदेहाचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबत असल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षभरापासून आम्ही दहाजण कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो, परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये अचानक कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पंधरा माणसे अतिरिक्त देण्यात आली आहेत. त्यामुळे आमच्यावरील ताण हलका झाला आहे.

- अरुण वानखेडे

कोरोना मृतांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे कधी दफनविधी तर कधी अग्नीडाग द्यावा लागतो, परंतु अनेक मयतांचे नातेवाईक दूरवरून शोक व्यक्त करतात. तर काहीचे नातेवाईकही अंत्यविधीला येत नाहीत.

- शोएब खान