शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

जालना : कोरोनाच्या आजाराने जिवंतपणी छळले जाते... हे मान्य आहे, परंतु कोरोनावर उपचार सुरू असताना जर कितीही प्रिय व्यक्तीचा ...

जालना : कोरोनाच्या आजाराने जिवंतपणी छळले जाते... हे मान्य आहे, परंतु कोरोनावर उपचार सुरू असताना जर कितीही प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इच्छा असूनही अनेकांना अंत्यसंस्कार विधिवत करता येत नाहीत. तर काही प्रकरणांमध्ये मात्र वेगळे अनुभव असून, रक्ताची नातीही पाणी देण्यासाठी पुढे येत नसल्याचे वास्तव अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाचा कहर सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात जवळपास ४६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात कोरोनावर ३७ हजार जणांनी मात केली आहे. कोरोनामुळेच केवळ मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे खूप नगण्य आहे. अन्य आजार असल्याने देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह ही कारणे आहेत. हे मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईक हजर असतात. परंतु ते अंत्यसंस्काराच्यावेळी बाहेरच राहून आम्हालाच अंत्यसंस्कार करण्यात सांगत असल्याचे दिसून आले.

शहरात मृत्यू वाढले

जालना शहरात मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. जवळपास वर्षभरात कोरोनाने ३६५ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यात जालना शहरच कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता.

५ माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही

मागील काही महिन्यांमध्ये जालन्यातील गांधीनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षभरात ३४५ पेक्षा अधिक मृतदेहांवर जालना पालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले आहेत. यावेळी जवळपास १५ पेक्षा अधिक नातेवाईकांनी मृतदेहाला पाणी पाजण्यासाठी देखील पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे अशा मृतदेहांवर आम्हीच शक्य तेवढे रितीरिवाज पाळून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेकजण हे स्मशानभूमीपासून शंभर फूट दूर राहूनच मृतदेहाचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबत असल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षभरापासून आम्ही दहाजण कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो, परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये अचानक कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पंधरा माणसे अतिरिक्त देण्यात आली आहेत. त्यामुळे आमच्यावरील ताण हलका झाला आहे.

- अरुण वानखेडे

कोरोना मृतांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे कधी दफनविधी तर कधी अग्नीडाग द्यावा लागतो, परंतु अनेक मयतांचे नातेवाईक दूरवरून शोक व्यक्त करतात. तर काहीचे नातेवाईकही अंत्यविधीला येत नाहीत.

- शोएब खान