शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

जालना : कोरोनाच्या आजाराने जिवंतपणी छळले जाते... हे मान्य आहे, परंतु कोरोनावर उपचार सुरू असताना जर कितीही प्रिय व्यक्तीचा ...

जालना : कोरोनाच्या आजाराने जिवंतपणी छळले जाते... हे मान्य आहे, परंतु कोरोनावर उपचार सुरू असताना जर कितीही प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इच्छा असूनही अनेकांना अंत्यसंस्कार विधिवत करता येत नाहीत. तर काही प्रकरणांमध्ये मात्र वेगळे अनुभव असून, रक्ताची नातीही पाणी देण्यासाठी पुढे येत नसल्याचे वास्तव अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाचा कहर सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात जवळपास ४६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात कोरोनावर ३७ हजार जणांनी मात केली आहे. कोरोनामुळेच केवळ मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे खूप नगण्य आहे. अन्य आजार असल्याने देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह ही कारणे आहेत. हे मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईक हजर असतात. परंतु ते अंत्यसंस्काराच्यावेळी बाहेरच राहून आम्हालाच अंत्यसंस्कार करण्यात सांगत असल्याचे दिसून आले.

शहरात मृत्यू वाढले

जालना शहरात मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. जवळपास वर्षभरात कोरोनाने ३६५ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यात जालना शहरच कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता.

५ माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही

मागील काही महिन्यांमध्ये जालन्यातील गांधीनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षभरात ३४५ पेक्षा अधिक मृतदेहांवर जालना पालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले आहेत. यावेळी जवळपास १५ पेक्षा अधिक नातेवाईकांनी मृतदेहाला पाणी पाजण्यासाठी देखील पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे अशा मृतदेहांवर आम्हीच शक्य तेवढे रितीरिवाज पाळून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेकजण हे स्मशानभूमीपासून शंभर फूट दूर राहूनच मृतदेहाचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबत असल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षभरापासून आम्ही दहाजण कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो, परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये अचानक कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पंधरा माणसे अतिरिक्त देण्यात आली आहेत. त्यामुळे आमच्यावरील ताण हलका झाला आहे.

- अरुण वानखेडे

कोरोना मृतांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे कधी दफनविधी तर कधी अग्नीडाग द्यावा लागतो, परंतु अनेक मयतांचे नातेवाईक दूरवरून शोक व्यक्त करतात. तर काहीचे नातेवाईकही अंत्यविधीला येत नाहीत.

- शोएब खान