शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

परतूर तालुक्यात अतिरिक्त ऊसाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST

नवीन ऊस लागवड वाढली : यंदा ऊसाच्या उत्पादनात वाढ परतूर : तालुक्यात अतिरिक्त ऊसाची चिंता वाढल्याने शहराजवळील बागेश्वरी ...

नवीन ऊस लागवड वाढली : यंदा ऊसाच्या उत्पादनात वाढ

परतूर : तालुक्यात अतिरिक्त ऊसाची चिंता वाढल्याने शहराजवळील बागेश्वरी साखर कारखाना मे अखेरपर्यंत चालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परतूर तालुका व परिसरात मागील वर्षीपासून मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होत आहे. गेल्यावर्षी ऊस नसल्याने लवकर बंद करावा लागणाऱ्या बागेश्वरी साखर कारखान्याचे प्रशासन यावर्षी अतिरिक्त ऊसामुळे चिंतेत पडले आहे. यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र ऊसाची लागवड वाढली आहे. परवानगीशिवाय तसेच कारखान्याकडे रितसर नोंद केल्यानंतरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाने करूनही असंख्य शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस सोडून सध्या कारखाना कार्यक्षेत्रातच जवळपास ८ हजार हेक्टरवर ऊस आहे. बागेश्वरी कारखान्याची दररोज मूळ गाळप क्षमता २,५०० मेट्रिक टन होती, ती आता तीन हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी कारखाना दररोज ३,३०० मेट्रिक टन गाळप करत आहे. मागील वर्षी ज्या कारखान्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस नेला होता, ते कारखानेही यावर्षी ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्याही ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बागेश्वरीला अडचणीत व नियमीत ऊस दिला, त्या शेतकऱ्यांना कारखाना प्राधान्य देणार आहे. गतवर्षी हेक्टरी ८० टनाचे उत्पन्न ऊस उत्पादकांना मिळाले होते, ते यावर्षी १०० टन मिळत असल्याने हा भारही कारखान्यावर वाढला आहे. एकूणच ऊसाचे वाढते क्षेत्र ही आता कारखान्याबरोबरच ऊस उत्पादकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. आजवर मॉ. बागेश्वरी साखर कारखान्याने १ लाख ९० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. दिनांक ३० डिसेंबरपासून ऊसाचा पहिला हप्ता २ हजार रूपये टन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी सांगितले. यावेळी सभापती कपिल आकात, सुधाकर कदम आदी उपस्थित होते.

चोकट

ऊस उभा राहणे चांगली बाब नाही - जाधव

मॉ. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, गाळपाअभावी शेतकऱ्यांचा ऊस उभा राहणे ही चांगली बाब नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून लागवड केलेला ऊस गेला नाही तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील. आम्ही कारखाना सुरळीत व शिस्तीत चालवत आहोत. आम्हाला कोणाचा ऊस न्यायचा नाही, असा विषय नाही, मात्र, कारखान्याची गाळप क्षमता वाढवूनही वाढलेल्या ऊसाचा भार झेपत नाही. मागील वर्षीचाच ऊस भरपूर आहे. यावर्षी पुन्हा लागवड वाढली आहे. त्यातच यंदा ऊसाच्या उत्पानातही वाढ झाली आहे. त्यामुळे कारखान्याने गाळप क्षमता वाढवून सुरळीत चालवूनही सर्व ऊसाचे गाळप होईल की नाही, याची शाश्वती नाही. कारखाना मे महिन्याअखेर चालेल पण पुढे टोळ्यांच्या अडचणी येतात. सर्व शेतकऱ्यांचा ऊस नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, कारखान्याची क्षमता व वाढलेले ऊसाचे क्षेत्र यामुळे अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही जाधव यांनी सांगितले.