शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

जालना : मागील काही दिवसांपासून फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. जालना जिल्ह्यातही फेसबुकवर बनावट अकाऊंट ...

जालना : मागील काही दिवसांपासून फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. जालना जिल्ह्यातही फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पैशांची मागणी केल्याच्या चार तक्रारी सायबर विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

आता प्रत्येक जण फेसबुक वापरत आहे. फेसबुकवर नवीन मित्र बनतात, तर काही जण बनावट अकाऊंट तयार करून फसवणूकदेखील करतात. फेसबुकवर एखाद्या व्यक्तीसोबत ओळख करून घेऊन, हळूहळू मैत्री घट्ट होते. त्यानंतर संबंधित व्यक्ती वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी करते. मित्र झाल्यामुळे सदर व्यक्ती पैसेदेखील देते. काही दिवसांनंतर सदर अकाऊंट बंद होते. मग संबंधिताला आपली फसवणूक झाल्याचे समजते. याची तक्रार सायबर विभागाकडे दिली जाते. जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल २६ जणांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर विभागाकडे आल्या आहेत. त्यापैकी यात चार जणांची फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणूक झाली आहे, तर ओटीपी दिल्याने तब्बल १२ जणांची फसवणूक झाली आहे. नागरिकांनी खबरदारी घेऊन कोणालाही आपली माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.

अशी घ्यावी काळजी

नागरिकांनी फेसबुकवर मित्र बनविताना काळजी घ्यावी. संबंधित व्यक्ती ही पैशांची मागणी करत असेल तर पैसे देऊ नयेत. ओळखीच्या व्यक्तिलाच मित्र बनवावा. तसेच कोणी बँकेच्या नावाखाली फोन करून ओटीपी देण्याची मागणी केली तर त्या व्यक्तिला ओटीपी देऊ नये. काही जण बक्षीस लागल्याच्या नावाखाली पैशांची मागणी करतात. यापासूनही जपून राहावे.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांनी २६ जणांची फसवणूक झालेली आहे, तर फेसबुकवरून पैशांची मागणी करून चार जणांची फवसणूक झाली. नागरिकांनी सर्तकता बाळगावी. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर विभागाला सांगावे.

- मारुती खेडकर, पोनि. सायबर विभाग

परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर

फेसबुकवरून फसवणूक करणारी व्यक्ती परिचयातील व्यक्तींच्या नावाचा वापर करून बनावट अकाऊंट तयार करतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडे वारंवार पैशांची मागणी केले जाते. यासाठी नागरिकांनी ओळखीच्या व्यक्तिनाच फेसबुकवर मित्र बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.