शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

उमेदवारांचे द्वंदयुद्ध एकेरीवर

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

जालना : जिल्ह्यात शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ले चढवून वातावरण पेटवून दिले आहे.

जालना : जिल्ह्यात शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ले चढवून वातावरण पेटवून दिले आहे. त्यातच प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभा जिल्ह्यात होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात कमालीची शांतता जाणवत होती. विशेषत: युती आणि आघाडी होण्याबाबतची चर्चा ताणल्या गेल्याने व शेवटी युती आणि आघाडी संपुष्टात आल्याने चारही पक्षांचा उमेदवार शोधण्यात वेळ गेला. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही बंड केलेल्या तसेच अन्य काही उमेदवांराची मनधरणी करण्यात उमेदवारांचा वेळ गेला. परिणामी, प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हे वातावरण चांगलेच पेटले आहे. शहरी व ग्रामीण भागात सभा-संमेलनातून उमेदवार व पदाधिकारी परस्परांच्या कार्यपद्धतीवर हल्ले चढवित असून, त्याद्वारे मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात शिवसेना, मनसेतर्फे भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले जात आहे. तर भाजपाकडून शिवसेनेवर टीका न करता दोन्ही काँग्रेसवर टीका केली जात आहे. मात्र जालना जिल्ह्यात भाजपा, सेनेच्या उमेदवारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवरच टीकेचे लक्ष्य ठेवले आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादीनेही भाजपा, सेनेवरच टीका सुरू केली आहे. मनसेकडून या चारही पक्षांवर टीका केली जात आहे. युती व आघाडी संपुष्टात आल्याने चारही पक्षांचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्रपणे लढत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडत आहेत. (प्रतिनिधी)जालन्यात आ. कैलास गोरंट्याल व त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. शहराच्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अरविंद चव्हाण हे या मतदारसंघातून प्रथमच तेही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याने केंद्रात मोदींना साथ देण्यासाठी राज्यात भाजपाचे सरकार आणावे व त्यासाठी आपणास निवडून द्यावे, असे आवाहन करीत आहेत. घनसावंगीमध्ये राष्ट्रवादीचे राजेश टोपे व त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपाकडून उभे असलेले विलास खरात यांच्यातही फैरी रंगत आहेत. तर सेनेचे हिकमत उढाण व मनसेचे सुनील आर्दड यांच्याकडून टोपेंना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. भोकरदनमध्ये राष्ट्रवादीचे आ. चंद्रकांत दानवे व भाजपाचे संतोष दानवे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत दानवे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. तर सेनेचे रमेश गव्हाड, काँग्रेसचे सुरेश गवळी, अपक्ष एल.के. दळवी हेही प्रतिस्पर्ध्यांवर टीका करीत आहेत.४बदनापूरमध्ये शिवसेनेचे आ. संतोष सांबरे व राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांच्यात कार्यपद्धतीवरून तसेच पक्षाच्या ध्येय, धोरणावरून टीका होत आहे. भाजपाचे नारायण कुचे व मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड हे नव्यानेच या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. गायकवाड यांनी टीकेचे लक्ष्य शिवसेनेवर ठेवले आहे. परतूरमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आ. सुरेश जेथलिया व भाजपाचे बबनराव लोणीकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. सेनेचे साखरे आणि राष्ट्रवादीचे सरकटे हेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका करीत आहेत.