शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST

पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष ...

पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांसमवेत काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर या भागातील ११ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शासनाच्या नुकसान अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने यंदा रब्बीचाही पेरा वाढला होता. शेतकऱ्यांनी रोगराईसह इतर नैसर्गिक आपत्तीवर मात करून रब्बीतील पिके जगविली आहेत. परंतु, पिंपळगाव रेणुकाई येथील वीज उपकेंद्रातून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी तीन हजार कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी विजेअभावी पाणी देता येत नसल्याने हातातोंडाशी आलेले रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांचा भडीमार करीत वीजपूर्वठा पूर्ववत करण्याची मागणी केली. आंदेालकांची आक्रमकता पाहता सहायक अभियंत्ता एस. यू. खोब्रागडे यांनी वीजपुरवठा पूर्ववत केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख,पंचायत समिती सदस्य गणेश लोंखडे,सुखलाल बोडके, सांडू वाघ, संजय चंदनसे, रमेश मिसाळ, शिवा लोंखडे, देवेंद्र लोंखडे, अमोल देशमुख, हरिभाऊ आहेर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याने पारध पोलीस ठाण्याचे पोनि. रमेश जायभाय यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश पडोळ, विकास जाधव, किशोर मोरे, लक्ष्मण रानगोते, नितेश खरात आदींनी बंदोबस्ताचे काम पाहिले.

शेतकऱ्यांना दिलासा

या आंदोलनानंतर ११ गावातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई, पारध बु., पारध खुर्द, पद्मावती, वरुड बु, रेलगाव, मोहळाई, माळेगाव, कोसगाव अवघडराव सांवगी आदी गावातील ३५० विद्युत रोहित्रावरील तीन हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रब्बीतील पिके हाती पडण्याची आशा निर्माण झाली आहे.

फोटो