शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

भाजपचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST

पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष ...

पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांसमवेत काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर या भागातील ११ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शासनाच्या नुकसान अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने यंदा रब्बीचाही पेरा वाढला होता. शेतकऱ्यांनी रोगराईसह इतर नैसर्गिक आपत्तीवर मात करून रब्बीतील पिके जगविली आहेत. परंतु, पिंपळगाव रेणुकाई येथील वीज उपकेंद्रातून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी तीन हजार कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी विजेअभावी पाणी देता येत नसल्याने हातातोंडाशी आलेले रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांचा भडीमार करीत वीजपूर्वठा पूर्ववत करण्याची मागणी केली. आंदेालकांची आक्रमकता पाहता सहायक अभियंत्ता एस. यू. खोब्रागडे यांनी वीजपुरवठा पूर्ववत केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख,पंचायत समिती सदस्य गणेश लोंखडे,सुखलाल बोडके, सांडू वाघ, संजय चंदनसे, रमेश मिसाळ, शिवा लोंखडे, देवेंद्र लोंखडे, अमोल देशमुख, हरिभाऊ आहेर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याने पारध पोलीस ठाण्याचे पोनि. रमेश जायभाय यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश पडोळ, विकास जाधव, किशोर मोरे, लक्ष्मण रानगोते, नितेश खरात आदींनी बंदोबस्ताचे काम पाहिले.

शेतकऱ्यांना दिलासा

या आंदोलनानंतर ११ गावातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई, पारध बु., पारध खुर्द, पद्मावती, वरुड बु, रेलगाव, मोहळाई, माळेगाव, कोसगाव अवघडराव सांवगी आदी गावातील ३५० विद्युत रोहित्रावरील तीन हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रब्बीतील पिके हाती पडण्याची आशा निर्माण झाली आहे.

फोटो