शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST

पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष ...

पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांसमवेत काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर या भागातील ११ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शासनाच्या नुकसान अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने यंदा रब्बीचाही पेरा वाढला होता. शेतकऱ्यांनी रोगराईसह इतर नैसर्गिक आपत्तीवर मात करून रब्बीतील पिके जगविली आहेत. परंतु, पिंपळगाव रेणुकाई येथील वीज उपकेंद्रातून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी तीन हजार कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी विजेअभावी पाणी देता येत नसल्याने हातातोंडाशी आलेले रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांचा भडीमार करीत वीजपूर्वठा पूर्ववत करण्याची मागणी केली. आंदेालकांची आक्रमकता पाहता सहायक अभियंत्ता एस. यू. खोब्रागडे यांनी वीजपुरवठा पूर्ववत केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख,पंचायत समिती सदस्य गणेश लोंखडे,सुखलाल बोडके, सांडू वाघ, संजय चंदनसे, रमेश मिसाळ, शिवा लोंखडे, देवेंद्र लोंखडे, अमोल देशमुख, हरिभाऊ आहेर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याने पारध पोलीस ठाण्याचे पोनि. रमेश जायभाय यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश पडोळ, विकास जाधव, किशोर मोरे, लक्ष्मण रानगोते, नितेश खरात आदींनी बंदोबस्ताचे काम पाहिले.

शेतकऱ्यांना दिलासा

या आंदोलनानंतर ११ गावातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई, पारध बु., पारध खुर्द, पद्मावती, वरुड बु, रेलगाव, मोहळाई, माळेगाव, कोसगाव अवघडराव सांवगी आदी गावातील ३५० विद्युत रोहित्रावरील तीन हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रब्बीतील पिके हाती पडण्याची आशा निर्माण झाली आहे.

फोटो