शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भाजपचा वारू रोखण्याचे आघाडीसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

जालना : शिवसेनेचे बोट पकडून महाराष्ट्रात रूजलेल्या भाजपला सध्या खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत. जालना लोकसभा मतदार संघात केंद्रीय ...

जालना : शिवसेनेचे बोट पकडून महाराष्ट्रात रूजलेल्या भाजपला सध्या खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत. जालना लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री हे १९९९पासून निवडून येत आहेत तर आज बदनापूर, परतूर तसेच भोकरदन येथे तीन आमदारही भाजपचेच आहेत. जालना जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र नसते तर तेथेही भाजपचेच सदस्य जास्त निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजप रूजले असून, त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले असून, आगामी काळात भाजपचा वारू रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. भाजपने खऱ्या अर्थाने आपली पाळमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक तसेच जनसंघाच्या माध्यमातून रूजवली. जनता पार्टीच्या तिकिटावर माजी खासदार पुंडलिक हरिदानवे हे १९७७मध्ये आणि नंतर भाजपच्या तिकिटावर १९८९मध्ये निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १९९६ आणि १९९८मध्ये उत्तमसिंग पवार हे विजयी झाले होते. नंतर २००४मध्ये उत्तमसिंग पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून रावसाहेब दानवेंना आव्हान दिले होते. परंतु, ते तेथे पराभूत झाले होते.

आज परतूर येथे आमदार बबनराव लोणीकर, बदनापूरला आमदार नारायण कुचे तर भोकरदन येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे खासदारकीसह तीन आमदार आहेत. आता जालना पालिकेच्या आगामी निवडणुकांकडे भाजपचा डोळा असून, त्यादृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, जालना पालिकेत आमदार कैलास गोरंट्याल यांचे गेल्या दहा वर्षांपासून चर्वस्व आहे. त्या वर्चस्वाला धक्का लावताना भाजपची मोठी दमछाक होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच लक्ष घातले असून, शिवसेना आणि काँग्रेसमधील बेबनाव हा भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. मात्र, असे असले तरी भाजपमधील खासदार दानवे आणि आमदार बबनराव लोणीकरांच्या गटबाजीमुळे येथे शह बसू शकतो, असेही सांगितले जाते. आज भाजपची शिवसेनेसोबत जालना बाजार समितीत युती असून, भास्कर दानवे हे उपसभापती आहेत. तसेच जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वत: रावसाहेब दानवे हे संचालक आहेत. त्यामुळे भाजपने आपली पाळेमुळे घट्ट केली असून, त्यांना धक्का देताना खरी कसोटी आता महाविकास आघाडीची राहणार आहे.

चौकट

आम्ही शर्थीचे प्रयत्न करणार

जालना पालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सर्व जागांवर उमेदवार देण्याची संधी यावेळी आहे. शिवसेना व भाजप युती नसल्याने हे शक्य होणार आहे. आज पालिकेतील सत्ताधारी प्रबळ आहेत. त्यांना धक्का देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनानुसार व्यूहरचना आखणे सुरू आहे. त्यामुळे पालिकेत भाजपचेच बहुमत कसे येईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.

- अशोक पारंगारकर, गटनेते, भाजप, जालना पालिका.