शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नियोजनबद्ध उपाययोजना अन् सूचनांच्या पालनामुळे भराडखेडा, मात्रेवाडी कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

बदनापूर : प्रशासनाकीय सूचनांचे पालन, आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीसह विविध विभागांना सोबत घेऊन केलेले नियोजन आणि उपाययोजनांमुळे तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी ...

बदनापूर : प्रशासनाकीय सूचनांचे पालन, आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीसह विविध विभागांना सोबत घेऊन केलेले नियोजन आणि उपाययोजनांमुळे तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तालुका आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या. तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी येथील बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण आणि तपासणीवर अधिकचा भर देण्यात आला. ग्रामस्थांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच कोरोना लढ्यातील महत्त्वाचे असलेले लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही तालुका आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे.

एकत्रितपणे केलेले प्रयत्न

ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय सूचनांचे पालन. योग्य नियोजन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून विविध उपाययोजनांवर भर दिला आहे.

बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन अलगीकरण केले. तसेच लसीकरण वेळेवर करण्यात अधिकचा भर दिला आहे.

लढा कोरोनाशी...

भारखेडा, मात्रेवाडी या गावांत आरोग्य विभागाकडून सकारात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी सूचनांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. इतर गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. योगेश सोळंके,

तालुका आरोग्य अधिकारी

योग्य नियोजन व सूचनांच्या पालनामुळे दोन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही. दोन्ही गावांत वेळोवेळी लसीकरण केले जात आहे. शिवाय नागरिकांना स्वच्छतेसह आरोग्याची काळजी घेण्याबाबतही आरोग्य विभागाकडून माहिती दिली जाते.

-डॉ. सीमा पनाड

गावातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन अलगीकरण करण्यात आले. गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. गाव कोरोनामुक्तीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व ग्रामस्थांची साथ मिळाली.

-सुदेश वाठोरे,

तालुका आरोग्य पर्यवेक्षक

पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न

भारखेडा, मात्रेवाडी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रयत्नही महत्त्वाचे ठरले.

गावांमधील सर्वपक्षीयांनी एकत्रित येत उपाययोजना प्रत्यक्षात राबविण्यावर भर दिल्यामुळे यश आले आहे.