शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

नियोजनबद्ध उपाययोजना अन् सूचनांच्या पालनामुळे भराडखेडा, मात्रेवाडी कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

बदनापूर : प्रशासनाकीय सूचनांचे पालन, आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीसह विविध विभागांना सोबत घेऊन केलेले नियोजन आणि उपाययोजनांमुळे तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी ...

बदनापूर : प्रशासनाकीय सूचनांचे पालन, आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीसह विविध विभागांना सोबत घेऊन केलेले नियोजन आणि उपाययोजनांमुळे तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तालुका आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या. तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी येथील बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण आणि तपासणीवर अधिकचा भर देण्यात आला. ग्रामस्थांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच कोरोना लढ्यातील महत्त्वाचे असलेले लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही तालुका आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे.

एकत्रितपणे केलेले प्रयत्न

ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय सूचनांचे पालन. योग्य नियोजन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून विविध उपाययोजनांवर भर दिला आहे.

बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन अलगीकरण केले. तसेच लसीकरण वेळेवर करण्यात अधिकचा भर दिला आहे.

लढा कोरोनाशी...

भारखेडा, मात्रेवाडी या गावांत आरोग्य विभागाकडून सकारात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी सूचनांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. इतर गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. योगेश सोळंके,

तालुका आरोग्य अधिकारी

योग्य नियोजन व सूचनांच्या पालनामुळे दोन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही. दोन्ही गावांत वेळोवेळी लसीकरण केले जात आहे. शिवाय नागरिकांना स्वच्छतेसह आरोग्याची काळजी घेण्याबाबतही आरोग्य विभागाकडून माहिती दिली जाते.

-डॉ. सीमा पनाड

गावातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन अलगीकरण करण्यात आले. गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. गाव कोरोनामुक्तीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व ग्रामस्थांची साथ मिळाली.

-सुदेश वाठोरे,

तालुका आरोग्य पर्यवेक्षक

पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न

भारखेडा, मात्रेवाडी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रयत्नही महत्त्वाचे ठरले.

गावांमधील सर्वपक्षीयांनी एकत्रित येत उपाययोजना प्रत्यक्षात राबविण्यावर भर दिल्यामुळे यश आले आहे.