शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सतरा दिवसांत चार हजार रुग्ण आढळल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीने सामान्य माणूस धास्तावला आहे. असे असतानाच यावर कुठला उपाय करावा, जेणेकरून रुग्णसंख्या घटेल, या चिंतेत ...

जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीने सामान्य माणूस धास्तावला आहे. असे असतानाच यावर कुठला उपाय करावा, जेणेकरून रुग्णसंख्या घटेल, या चिंतेत प्रशासन आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहेत. आता अनेक ठिकाणी आवाहन करूनही गर्दी कमी होण्याचे चिन्ह नसल्याने हे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढ नेमकी कुठल्या कारणाने होत आहे, याबद्दल तज्ज्ञदेखील केवळ अनुमान बांधत आहेत.

या संदर्भात येथील डॉक्टर राजेश सेठिया म्हणाले की, वातावरण बदलानेदेखील अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आहेत. परंतु, जर तीन दिवसांपेक्षा अधिक ही लक्षणे कायम राहून थकवा जाणवल्यास लगेचच संबंधितांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. एकूणच विषाणूने त्याचे रूप बदलले असून, ही बाब गंभीर आहे. या रूपबदलातून पूर्वीइतकी भयानकता नसून, हा विषाणू केवळ झपाट्याने स्प्रेड होत आहे. यावर उपाय म्हणून सुरक्षित अंतर तसेच मास्कचा वापर बंधनकारक केला पाहिजे. हे काम प्रशासनावर सोडून जमणार नाही, तर त्यासाठी वैयक्तिक पातळीवरच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची कसरत

अचानक रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांना जास्त त्रास नाही, अशांना आता त्यांच्या घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर, यासाठी जिल्हा प्रशासनाने अलगीकरण केंद्राची व्यवस्था केली आहे. तेथेही आता रुग्ण वाढत आहेत. मध्यंतरी, रुग्ण घटल्याने हे अलगीकरण कक्ष बंद केले होते. ते नव्याने सुरू करण्यात आले आहेत.

चौकट

एक ते १७ मार्च दरम्यानचे रूग्ण