शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सतरा दिवसांत चार हजार रुग्ण आढळल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीने सामान्य माणूस धास्तावला आहे. असे असतानाच यावर कुठला उपाय करावा, जेणेकरून रुग्णसंख्या घटेल, या चिंतेत ...

जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीने सामान्य माणूस धास्तावला आहे. असे असतानाच यावर कुठला उपाय करावा, जेणेकरून रुग्णसंख्या घटेल, या चिंतेत प्रशासन आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहेत. आता अनेक ठिकाणी आवाहन करूनही गर्दी कमी होण्याचे चिन्ह नसल्याने हे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढ नेमकी कुठल्या कारणाने होत आहे, याबद्दल तज्ज्ञदेखील केवळ अनुमान बांधत आहेत.

या संदर्भात येथील डॉक्टर राजेश सेठिया म्हणाले की, वातावरण बदलानेदेखील अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आहेत. परंतु, जर तीन दिवसांपेक्षा अधिक ही लक्षणे कायम राहून थकवा जाणवल्यास लगेचच संबंधितांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. एकूणच विषाणूने त्याचे रूप बदलले असून, ही बाब गंभीर आहे. या रूपबदलातून पूर्वीइतकी भयानकता नसून, हा विषाणू केवळ झपाट्याने स्प्रेड होत आहे. यावर उपाय म्हणून सुरक्षित अंतर तसेच मास्कचा वापर बंधनकारक केला पाहिजे. हे काम प्रशासनावर सोडून जमणार नाही, तर त्यासाठी वैयक्तिक पातळीवरच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची कसरत

अचानक रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांना जास्त त्रास नाही, अशांना आता त्यांच्या घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर, यासाठी जिल्हा प्रशासनाने अलगीकरण केंद्राची व्यवस्था केली आहे. तेथेही आता रुग्ण वाढत आहेत. मध्यंतरी, रुग्ण घटल्याने हे अलगीकरण कक्ष बंद केले होते. ते नव्याने सुरू करण्यात आले आहेत.

चौकट

एक ते १७ मार्च दरम्यानचे रूग्ण