शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

आरोग्य सुविधांच्या मुद्यावरील लोणीकरांची याचिका स्वीकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नियोजनाबद्दलही शंका घेऊन पाहिजे तसे नियोजन न झाल्यानेच ...

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नियोजनाबद्दलही शंका घेऊन पाहिजे तसे नियोजन न झाल्यानेच कोरोनाचे उपचार रुग्णांना वेळेत मिळाले नसल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे आ. लोणीकर म्हणाले. या सर्व गंभीर मुद्यांना लक्षात घेऊन आपण ही जनहित याचिका दाखल केल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने या याचिकेतील सर्व मुद्दे लक्षात घेत ती दाखल करून घेतानाच प्रशासनातील आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ आणि जबाबदार अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याचेही यावेळी लोणीकरांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ६२/२०२१ या क्रमांकाची जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या याचिकेत त्यांनी जालना जिल्ह्यातील रिक्तपदांसह आरोग्य केंद्रात सीटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन नसणे आदी मुद्दे याचिकेत समाविष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यात प्रामुख्याने

राष्ट्रीय आरोग्य योजनेनुसार ३ हजार लोकसंख्येला १ आरोग्य उपकेंद्र, तर २० हजार लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना १ ग्रामीण रुग्णालय असणे अपेक्षित आहे; परंतु महाराष्ट्रात मात्र त्या विपरीत परिस्थिती आपल्याला दिसून येईल. महाराष्ट्रात एकूण १० हजार ६३८ उपकेंद्र, १८२३ प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २७३ ग्रामीण रुग्णालय आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था प्रचंड भयानक असून जालना जिल्ह्यात ४३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर केवळ ५ प्रयोगशाळा आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राला १ प्रयोगशाळा असणे अपेक्षित आहे ज्या प्रयोग शाळा आहेत त्या प्रयोगशाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाही, अशी दयनीय अवस्था आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे, असेही लोणीकर यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.

विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १०३ पैकी केवळ ४९ पदे भरलेली असून ५४ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकांच्या २७० पैकी १०४ पदे रिक्त आहेत. महिला आरोग्य सेवकांची १७० पदे रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.