शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३४ हजार लोकांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

४२ हजार जणांना झाली होती लागण; हिमतीने सामोरे जाण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून ...

४२ हजार जणांना झाली होती लागण; हिमतीने सामोरे जाण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग हादरले आहे. अर्थकारणासह मानवी जीवनालाही या विषाणूने धोक्यात आणले आहे; परंतु हा आजार झाला म्हणजे आपण यातून बरेच होणार नाही, असा गैरसमज न करता या आजाराला मानसिकदृष्ट्या खंबीर राहून औषधोपचार घेतल्यास यातून बरे हाेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावर मात करून पूर्ववत जीवन सुरू केले आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्या वर्षी ६ एप्रिलपासून झाला. पहिला रुग्ण याच दिवशी आढळून आला होता. त्यानंतर यावर उपाय करण्यासाठी डॉक्टर तसेच सरकार आणि प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले. यातून मोठे यशही आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या आजाराने पुन्हा डाेके वर काढले आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचा तज्ज्ञांचा दावा असून पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट जास्त गतीने फैलणारी असल्याचे सांगण्यात येत त्यामुळे अनेकांना हा आजार जडत आहे. यातून बरे होण्यासाठी जे निकष घालून दिले आहेत. त्याचे पालन केल्यास सहीसलामत आजारावर मात करता येते.

जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेटही झाला कमी

जालना जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. तो २४ एप्रिलपर्यंत १५.७ टक्के आहे.

घाबरू नका, आम्हीही हरवले आहे

आपण गेल्या ५० वर्षांपासून वेगवेगळे आजार पाहत आलो आहोत; परंतु सर्दी, खोकला आणि ताप एवढी गंभीर असू शकते हे कोरोनामुळे लक्षात आले आहे. या आजारावर मात करण्यासाठी तुमची मनाची खंबीरता महत्त्वाची ठरते. त्यामुळे आजार झाल्यावर घाबरून जाऊ नये.

- गणेश रोकडे

गेल्या काही महिन्यांमध्ये आमच्या घरातील अनेकांना तापेची लक्षणे दिसू लागली; परंतु ताप म्हणजे संसर्ग नव्हे, अशी धारण होती. मात्र, कोरोनाने ही धारणा पूर्णपणे बदलली आहे. या आजाराने मलाही घेरले होते; परंतु योग्य त्या औषधाने आपण बरे झालो.

- शेंफडाबाई तळेकर

प्रवास करत असताना आपल्याला कोरोनाची लागण झाली असावी, ती झाल्यानंतर आपण घेतलेले उपचार महत्त्वाचे ठरले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सर्व काही केल्याने आपण या आजारावर मात केली आहे.

- रंजनी जोशी

कोरोना हा आजार जेवढा गंभीर आहे. तेवढेच तो आजार होऊन गेल्यानंतर होणारे परिणाम अनेक रुग्णांमध्ये वेगवेगळे आहेत. कोरोना झाला म्हणजे आपले सर्वस्व हरवले. प्रथम ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कमी जणांना मानसिक आजार जडत असल्याचे गेल्या वर्षभरातील पाहणीतून दिसून आले. महिना ते दीड महिना अशक्तपणामुळे चिडचिड होते; परंतु नंतर हेही थांबते. असे अभ्यासातून दिसून येत असल्याचे समोर आले आहे.

- सूरज सेठीया,

मानसोपचार तज्ज्ञ