शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जिल्ह्यातील ३४ हजार लोकांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

४२ हजार जणांना झाली होती लागण; हिमतीने सामोरे जाण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून ...

४२ हजार जणांना झाली होती लागण; हिमतीने सामोरे जाण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग हादरले आहे. अर्थकारणासह मानवी जीवनालाही या विषाणूने धोक्यात आणले आहे; परंतु हा आजार झाला म्हणजे आपण यातून बरेच होणार नाही, असा गैरसमज न करता या आजाराला मानसिकदृष्ट्या खंबीर राहून औषधोपचार घेतल्यास यातून बरे हाेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावर मात करून पूर्ववत जीवन सुरू केले आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्या वर्षी ६ एप्रिलपासून झाला. पहिला रुग्ण याच दिवशी आढळून आला होता. त्यानंतर यावर उपाय करण्यासाठी डॉक्टर तसेच सरकार आणि प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले. यातून मोठे यशही आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या आजाराने पुन्हा डाेके वर काढले आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचा तज्ज्ञांचा दावा असून पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट जास्त गतीने फैलणारी असल्याचे सांगण्यात येत त्यामुळे अनेकांना हा आजार जडत आहे. यातून बरे होण्यासाठी जे निकष घालून दिले आहेत. त्याचे पालन केल्यास सहीसलामत आजारावर मात करता येते.

जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेटही झाला कमी

जालना जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. तो २४ एप्रिलपर्यंत १५.७ टक्के आहे.

घाबरू नका, आम्हीही हरवले आहे

आपण गेल्या ५० वर्षांपासून वेगवेगळे आजार पाहत आलो आहोत; परंतु सर्दी, खोकला आणि ताप एवढी गंभीर असू शकते हे कोरोनामुळे लक्षात आले आहे. या आजारावर मात करण्यासाठी तुमची मनाची खंबीरता महत्त्वाची ठरते. त्यामुळे आजार झाल्यावर घाबरून जाऊ नये.

- गणेश रोकडे

गेल्या काही महिन्यांमध्ये आमच्या घरातील अनेकांना तापेची लक्षणे दिसू लागली; परंतु ताप म्हणजे संसर्ग नव्हे, अशी धारण होती. मात्र, कोरोनाने ही धारणा पूर्णपणे बदलली आहे. या आजाराने मलाही घेरले होते; परंतु योग्य त्या औषधाने आपण बरे झालो.

- शेंफडाबाई तळेकर

प्रवास करत असताना आपल्याला कोरोनाची लागण झाली असावी, ती झाल्यानंतर आपण घेतलेले उपचार महत्त्वाचे ठरले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सर्व काही केल्याने आपण या आजारावर मात केली आहे.

- रंजनी जोशी

कोरोना हा आजार जेवढा गंभीर आहे. तेवढेच तो आजार होऊन गेल्यानंतर होणारे परिणाम अनेक रुग्णांमध्ये वेगवेगळे आहेत. कोरोना झाला म्हणजे आपले सर्वस्व हरवले. प्रथम ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कमी जणांना मानसिक आजार जडत असल्याचे गेल्या वर्षभरातील पाहणीतून दिसून आले. महिना ते दीड महिना अशक्तपणामुळे चिडचिड होते; परंतु नंतर हेही थांबते. असे अभ्यासातून दिसून येत असल्याचे समोर आले आहे.

- सूरज सेठीया,

मानसोपचार तज्ज्ञ