शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३४ हजार लोकांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

४२ हजार जणांना झाली होती लागण; हिमतीने सामोरे जाण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून ...

४२ हजार जणांना झाली होती लागण; हिमतीने सामोरे जाण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग हादरले आहे. अर्थकारणासह मानवी जीवनालाही या विषाणूने धोक्यात आणले आहे; परंतु हा आजार झाला म्हणजे आपण यातून बरेच होणार नाही, असा गैरसमज न करता या आजाराला मानसिकदृष्ट्या खंबीर राहून औषधोपचार घेतल्यास यातून बरे हाेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावर मात करून पूर्ववत जीवन सुरू केले आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्या वर्षी ६ एप्रिलपासून झाला. पहिला रुग्ण याच दिवशी आढळून आला होता. त्यानंतर यावर उपाय करण्यासाठी डॉक्टर तसेच सरकार आणि प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले. यातून मोठे यशही आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या आजाराने पुन्हा डाेके वर काढले आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचा तज्ज्ञांचा दावा असून पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट जास्त गतीने फैलणारी असल्याचे सांगण्यात येत त्यामुळे अनेकांना हा आजार जडत आहे. यातून बरे होण्यासाठी जे निकष घालून दिले आहेत. त्याचे पालन केल्यास सहीसलामत आजारावर मात करता येते.

जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेटही झाला कमी

जालना जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. तो २४ एप्रिलपर्यंत १५.७ टक्के आहे.

घाबरू नका, आम्हीही हरवले आहे

आपण गेल्या ५० वर्षांपासून वेगवेगळे आजार पाहत आलो आहोत; परंतु सर्दी, खोकला आणि ताप एवढी गंभीर असू शकते हे कोरोनामुळे लक्षात आले आहे. या आजारावर मात करण्यासाठी तुमची मनाची खंबीरता महत्त्वाची ठरते. त्यामुळे आजार झाल्यावर घाबरून जाऊ नये.

- गणेश रोकडे

गेल्या काही महिन्यांमध्ये आमच्या घरातील अनेकांना तापेची लक्षणे दिसू लागली; परंतु ताप म्हणजे संसर्ग नव्हे, अशी धारण होती. मात्र, कोरोनाने ही धारणा पूर्णपणे बदलली आहे. या आजाराने मलाही घेरले होते; परंतु योग्य त्या औषधाने आपण बरे झालो.

- शेंफडाबाई तळेकर

प्रवास करत असताना आपल्याला कोरोनाची लागण झाली असावी, ती झाल्यानंतर आपण घेतलेले उपचार महत्त्वाचे ठरले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सर्व काही केल्याने आपण या आजारावर मात केली आहे.

- रंजनी जोशी

कोरोना हा आजार जेवढा गंभीर आहे. तेवढेच तो आजार होऊन गेल्यानंतर होणारे परिणाम अनेक रुग्णांमध्ये वेगवेगळे आहेत. कोरोना झाला म्हणजे आपले सर्वस्व हरवले. प्रथम ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कमी जणांना मानसिक आजार जडत असल्याचे गेल्या वर्षभरातील पाहणीतून दिसून आले. महिना ते दीड महिना अशक्तपणामुळे चिडचिड होते; परंतु नंतर हेही थांबते. असे अभ्यासातून दिसून येत असल्याचे समोर आले आहे.

- सूरज सेठीया,

मानसोपचार तज्ज्ञ