शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात दोन वर्षात विविध कारणांमुळे ३१ विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बडून, चक्कर येऊन, सर्प दंश, विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास राजीव गांधी विद्यार्थी अपघात ...

शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बडून, चक्कर येऊन, सर्प दंश, विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ७५ हजार रूपये दिले जातात. ही योजना शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील दोन वर्षात ३१ विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. यात पाण्यात बुडून सर्वाधिक २१ विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. विजेचा शॉक लागून २, अपघातात ६ तर चक्कर येणे एकाच मृत्यू झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व मयत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मंजुरीदेखील दिली आहेत. परंतु, शासनाने निधी मंजूर न केल्याने अद्याप लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. याकडे लक्ष देऊन तातडीने अनुदान देण्याची मागणी होत आहे.

शालेय विद्यार्थाचा अपघाती, पाण्यात बडून, विजेचा शॉक लागून आदी कारणांमुळे मृत्यू झाल्यास राजीव गांधी अपघात योजनेअंतर्गत ७५ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. परंतु, शासनाने निधी न दिल्यामुळे संबंधितांना अनुदान देण्यात आले नाही. निधी प्राप्त होताच अनुदान दिले जाईल.

- बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी

निधी नसल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळेना

जालना जिल्ह्यात मागील दोन वर्षात ३१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७५ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. त्यानुसार शिक्षण विभागाने सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली आहेत. परंतु, राज्य शासनाने निधी न दिल्याने लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. हे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.