शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

१ लाख ६५ हजार २६९ निराधारांना ‘आधार’; प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन ...

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना या पाच योजनांच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांची उपासमार होणार नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या घोषणेचे सर्व लाभार्थ्यांनी स्वागत केले आहे.

कोरोनामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. त्यामुळे आम्हाला कामही मिळत नाही. आर्थिक परिस्थिती विस्कटलेली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एक हजार रुपये देण्याची घोषणा केली खरी; परंतु प्रत्यक्षात ही रक्कम कधी मिळणार आहे हे शासनाने स्पष्ट करावे.

- भिका राऊत

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या काळात हाताला कामही मिळत नाही. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात गोरगरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. हा निर्णय योग्य असून, ती रक्कम लवकर द्यावी.

- अभिषेक माने

वर्षभरापासून आम्ही शेतकरी हैराण आहोत. कोरोनाने आमच्यावर मोठे संकट ओढवले आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊसही पिकांचे नुकसान करीत आहे. अशा परिस्थितीत शासनाने दिलेली एक हजार रुपयांची मदत आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परंतु, ती आम्हाला कधी मिळणार हे सांगावे.

- शशिकला कावळे

राज्य सरकारने संकटाच्या काळात आम्हाला जी मदत केलेली आहे ती फार कमी आहे. सध्या महागाई वाढल्याने हजार रुपयांत काय होईल हे तुम्हीच सांगा. शासनाने दिलेल्या रकमेत वाढ करावी.

- श्याम बोंद्रे

शेतकऱ्यांवर संकटांची मालिकाच सुरू आहे. कधी अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करतो तर कधी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने कोरोना काळात दिलेली मदत ही अत्यल्प आहे. त्यात काहीच होणार नाही.

- अनसूयाबाई कोरडे