शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात २० टक्के अन्न वाया जाते!

By admin | Updated: February 22, 2017 00:57 IST

जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील

लंडन : जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील सर्वच संस्कृतींमध्ये एकेकाळी चांगल्या सवयी मानल्या जायच्या. पण बदललेल्या जीवनशैलीत जगभरातील लोकांना उपलब्ध असलेले सुमारे २० टक्के अन्न नको तेवढे खाण्याने किंवा पानात वाढून घेतलेले न खाता फेकून दिल्याने वाया जाते, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.ब्रिटनमधील एडिन्बर्ग विद्यापीठातील अभ्यासकांनी या अभ्यासावर आधारित शोधनिबंध ‘अ‍ॅग्रीकल्चरल सिस्टिम्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे. प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न अणि कृषी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करता या अभ्यासकांना असे आढळले की, उत्पादन, प्रक्रिया आणि सेवन या साखळीत प्रत्यक्षात पूर्वी मानले जात होते, त्याहून जास्त अन्नाची नासाडी होते. (वृत्तसंस्था)जगभरातील लोक गरजेपेक्षा १० टक्के जास्त अन्नाचे सेवन करतातजगभरात जेवढे अन्नधान्य पिकविले जाते त्याच्या निम्मे २.१ अब्ज टन अन्न वाया जाते. प्राणीज अन्नपदार्थांची उत्पादन प्र्रक्रिया सर्वाधिक अकार्यक्षम असल्याने अशा प्रकारे तयार होणारे सुमारे ७८ टक्के म्हणजे ८४० दशलक्ष टन अन्नाची नाशाडी होते.जगभरात २४० दशलक्ष टन प्राणीज खाद्यपदार्थांचे उत्पादन करण्यासाठी अन्नधान्याच्या पिकांपैकी सुमारे १.०८ अब्ज टन एवढा मोठा हिस्सा वापरला जातो.या एकाच टप्प्याला पिकविलेल्या ४० टक्के अन्नधान्य पिके कोणाच्याही पोषणासाठी वापर न होता वाया जातात.नको तेवढे खाण्याने एकूणच अन्न व्यवस्थेवर कसा व किती दुष्परिणाम होतो हे आजवर स्पष्ट नव्हते. पण आम्हाला असे आढळले की, नको तेवढे अन्न खाणे केवळ खाणाऱ्याच्या प्रकृतीलाच हानीकारक नाही तर त्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते व अन्न सुरक्षा कुंठित होते.- पीटर अ‍ॅलेक्झांडर, एडिनबर्ग स्कूल आॅफ जिओसायन्सेस