शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

जगभरात २० टक्के अन्न वाया जाते!

By admin | Updated: February 22, 2017 00:57 IST

जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील

लंडन : जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील सर्वच संस्कृतींमध्ये एकेकाळी चांगल्या सवयी मानल्या जायच्या. पण बदललेल्या जीवनशैलीत जगभरातील लोकांना उपलब्ध असलेले सुमारे २० टक्के अन्न नको तेवढे खाण्याने किंवा पानात वाढून घेतलेले न खाता फेकून दिल्याने वाया जाते, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.ब्रिटनमधील एडिन्बर्ग विद्यापीठातील अभ्यासकांनी या अभ्यासावर आधारित शोधनिबंध ‘अ‍ॅग्रीकल्चरल सिस्टिम्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे. प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न अणि कृषी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करता या अभ्यासकांना असे आढळले की, उत्पादन, प्रक्रिया आणि सेवन या साखळीत प्रत्यक्षात पूर्वी मानले जात होते, त्याहून जास्त अन्नाची नासाडी होते. (वृत्तसंस्था)जगभरातील लोक गरजेपेक्षा १० टक्के जास्त अन्नाचे सेवन करतातजगभरात जेवढे अन्नधान्य पिकविले जाते त्याच्या निम्मे २.१ अब्ज टन अन्न वाया जाते. प्राणीज अन्नपदार्थांची उत्पादन प्र्रक्रिया सर्वाधिक अकार्यक्षम असल्याने अशा प्रकारे तयार होणारे सुमारे ७८ टक्के म्हणजे ८४० दशलक्ष टन अन्नाची नाशाडी होते.जगभरात २४० दशलक्ष टन प्राणीज खाद्यपदार्थांचे उत्पादन करण्यासाठी अन्नधान्याच्या पिकांपैकी सुमारे १.०८ अब्ज टन एवढा मोठा हिस्सा वापरला जातो.या एकाच टप्प्याला पिकविलेल्या ४० टक्के अन्नधान्य पिके कोणाच्याही पोषणासाठी वापर न होता वाया जातात.नको तेवढे खाण्याने एकूणच अन्न व्यवस्थेवर कसा व किती दुष्परिणाम होतो हे आजवर स्पष्ट नव्हते. पण आम्हाला असे आढळले की, नको तेवढे अन्न खाणे केवळ खाणाऱ्याच्या प्रकृतीलाच हानीकारक नाही तर त्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते व अन्न सुरक्षा कुंठित होते.- पीटर अ‍ॅलेक्झांडर, एडिनबर्ग स्कूल आॅफ जिओसायन्सेस