शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

असुरक्षित अन्नामुळे वाढला जागतिक धोका

By admin | Updated: April 7, 2015 03:50 IST

कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक

वॉशिंग्टन : कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक आरोग्य संघटनेने कीटकजन्य अन्नपदार्थांच्या सेवनाने २०१० मध्ये सुमारे तीन लाख ५१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना आज ७ एप्रिलपासून शेतापासून ताटापर्यंत हे आरोग्य जागृतीपर अभियान राबविणार आहे. आज जागतिक आरोग्य दिन आहे.असुरक्षित अन्नपदार्थ, उदाहरणार्थ न शिजलेले जेवण सेवन करणे म्हणजे २०० आजारांना आमंत्रणच आहे. जुलाबापासून कर्करोगासारख्या आजारांचा धोका आहे. आधुनिक पद्धतीने अन्न उत्पादनामुळेही प्राणघातक किटाणूंचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. असुरक्षित अन्नपदार्थांत प्राणघातक जिवाणू, विषाणू, परोपजीवी किंवा रसायने असतात. न शिजवलेले अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळे यात विष्ठा आणि जलचर प्राणी यात सागरी जैव विष असते. आगामी काळात असे अन्नपदार्थ असलेले एखादे प्लेटही धोक्याचे आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यासंदर्भात आपल्या पहिल्या अहवालात संघटनेने ‘स्थानिक अन्न समस्या ही आता तात्काळ जागतिक आणीबाणीमध्ये रूपांतरित’ होत असल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर मार्गारेट चांग यांनी म्हटले की, ‘अन्न उत्पादनाचे औद्योगिकीकरण होत असून त्यांचा व्यापार आणि वितरणही वैश्विक झाले आहे. या बदलांमुळे अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू, परजीवी आणि रसायने यांचे जागतिक पातळीवर वहन होणे सोयीचे झाले आहे.’ (वृत्तसंस्था)