शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

असुरक्षित अन्नामुळे वाढला जागतिक धोका

By admin | Updated: April 7, 2015 03:50 IST

कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक

वॉशिंग्टन : कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक आरोग्य संघटनेने कीटकजन्य अन्नपदार्थांच्या सेवनाने २०१० मध्ये सुमारे तीन लाख ५१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना आज ७ एप्रिलपासून शेतापासून ताटापर्यंत हे आरोग्य जागृतीपर अभियान राबविणार आहे. आज जागतिक आरोग्य दिन आहे.असुरक्षित अन्नपदार्थ, उदाहरणार्थ न शिजलेले जेवण सेवन करणे म्हणजे २०० आजारांना आमंत्रणच आहे. जुलाबापासून कर्करोगासारख्या आजारांचा धोका आहे. आधुनिक पद्धतीने अन्न उत्पादनामुळेही प्राणघातक किटाणूंचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. असुरक्षित अन्नपदार्थांत प्राणघातक जिवाणू, विषाणू, परोपजीवी किंवा रसायने असतात. न शिजवलेले अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळे यात विष्ठा आणि जलचर प्राणी यात सागरी जैव विष असते. आगामी काळात असे अन्नपदार्थ असलेले एखादे प्लेटही धोक्याचे आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यासंदर्भात आपल्या पहिल्या अहवालात संघटनेने ‘स्थानिक अन्न समस्या ही आता तात्काळ जागतिक आणीबाणीमध्ये रूपांतरित’ होत असल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर मार्गारेट चांग यांनी म्हटले की, ‘अन्न उत्पादनाचे औद्योगिकीकरण होत असून त्यांचा व्यापार आणि वितरणही वैश्विक झाले आहे. या बदलांमुळे अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू, परजीवी आणि रसायने यांचे जागतिक पातळीवर वहन होणे सोयीचे झाले आहे.’ (वृत्तसंस्था)