शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

उरीचा हल्ला भारतानंच घडवला - पाकच्या उलट्या बोंबा

By admin | Updated: September 20, 2016 13:33 IST

उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.
पाकिस्तानमधल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी शीखांचा स्वतंत्र काश्मिर मागणाऱ्या मुस्लीमांना पाठिंबा असल्याचे सांगत हिंदूंचा वरचश्मा असलेल्या सरकारनं शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा बनाव रचल्याचा हास्यास्पद कांगावा केला आहे.
काश्मिरमधला हिंसाचार लपवणे, पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करणे, शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करणे आणि नवाझ शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्रातील संदेशाचं महत्त्व कमी करणे असे अनेक पक्षी एका दगडात मारण्याचा प्रयत्न घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यातून भारत करत असल्याचं या सुरक्षा अधिकाऱ्याने दी न्यूज इंटरनॅशलला सांगितलं आहे.
 
आणखी वाचा
 
कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज - राहील शरीफ
पाकिस्तानला धडा शिकवण्याचे भारतासमोर 'हे' सहा पर्याय
तडकाफडकी लष्करी कारवाई टाळा - कमांडर्सचा सरकाला सल्ला
 
जर, भारताने नियंत्रणरेषेवर कुंपण घातले आहे आणि लेझर सेन्सर बसवले आहेत, तर सीमेपलिकडून घुसखोरी होऊच कशी शकेल असा सवालही या वृत्तपत्रात विचारण्यात आला आहे. जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या व अत्याधुनिक उपकरणे असलेल्या भारतीय लष्कराला चकमा देऊन मूठभर दहशतवादी असा हल्ला घडवूच कसा शकतात अशी खिल्लीही उडवण्यात आली आहे.