शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उरीचा हल्ला भारतानंच घडवला - पाकच्या उलट्या बोंबा

By admin | Updated: September 20, 2016 13:33 IST

उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.
पाकिस्तानमधल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी शीखांचा स्वतंत्र काश्मिर मागणाऱ्या मुस्लीमांना पाठिंबा असल्याचे सांगत हिंदूंचा वरचश्मा असलेल्या सरकारनं शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा बनाव रचल्याचा हास्यास्पद कांगावा केला आहे.
काश्मिरमधला हिंसाचार लपवणे, पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करणे, शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करणे आणि नवाझ शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्रातील संदेशाचं महत्त्व कमी करणे असे अनेक पक्षी एका दगडात मारण्याचा प्रयत्न घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यातून भारत करत असल्याचं या सुरक्षा अधिकाऱ्याने दी न्यूज इंटरनॅशलला सांगितलं आहे.
 
आणखी वाचा
 
कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज - राहील शरीफ
पाकिस्तानला धडा शिकवण्याचे भारतासमोर 'हे' सहा पर्याय
तडकाफडकी लष्करी कारवाई टाळा - कमांडर्सचा सरकाला सल्ला
 
जर, भारताने नियंत्रणरेषेवर कुंपण घातले आहे आणि लेझर सेन्सर बसवले आहेत, तर सीमेपलिकडून घुसखोरी होऊच कशी शकेल असा सवालही या वृत्तपत्रात विचारण्यात आला आहे. जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या व अत्याधुनिक उपकरणे असलेल्या भारतीय लष्कराला चकमा देऊन मूठभर दहशतवादी असा हल्ला घडवूच कसा शकतात अशी खिल्लीही उडवण्यात आली आहे.