शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

उरी हल्ला - काश्मीर मुद्दा लपविण्यासाठी भारताकडून जगाची दिशाभूल

By admin | Updated: September 19, 2016 21:24 IST

काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, असा अजब दावा पाकिस्तानने केला आहे.

ऑनलाइ लोकमत

इस्लामाबाद, दि. १९ : काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, असा अजब दावा पाकिस्तानने केला आहे. उरी हल्ल्यानंतरच्या भारताच्या कडवट आणि निराधार आरोपातून हेच सिद्ध होते, असा जावईशोधही पाकिस्तानने लावला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी हे मत व्यक्त केले आहे. सरताज अजीज म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर भारताकडून आलेल्या प्रतिक्रिया आम्ही गांभीर्याने घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेले निराधार आणि बेजबाबदार आरोप पाकिस्तानने फेटाळले आहेत.

हिज्बुलचा कमांडर बुऱ्हाण वाणी याच्या मृत्यूनंतर झपाट्याने बिघडणाऱ्या काश्मिरातील मानवाधिकारांच्या स्थितीपासून लक्ष विचलित करण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे. अजीज म्हणाले की, काश्मिरातील परिस्थिती पाकिस्तानने तयार केलेली नाही. अवैध भारतीय कब्जा आणि अत्याचाराच्या दीर्घ इतिहासाने काश्मिरात हजारो नागरिकांचे बळी गेलेले आहेत. सरकारी बळाचा वापर करून महिला, मुले, हॉस्पिटलमधील जखमी, वृद्ध यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाने आता जागे व्हायला हवे. दरम्यान, पाकिस्तान दहशतवादी देश आहे, या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना अजीज म्हणाले की, चौकशीपूर्वीच पाकिस्तानला दोष देणे निंदनीय आहे. व्हेनेझुएला येथे होत असलेल्या अलिप्तवादी गटांच्या शिखर संमेलनात पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत असलेले अजीज म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या घोषणापत्रानुसार काश्मीर मुद्यावर तोडगा काढल्याशिवाय दक्षिण आशियात शांतता स्थापन होणार नाही.