शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

उरी हल्ला - काश्मीर मुद्दा लपविण्यासाठी भारताकडून जगाची दिशाभूल

By admin | Updated: September 19, 2016 21:24 IST

काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, असा अजब दावा पाकिस्तानने केला आहे.

ऑनलाइ लोकमत

इस्लामाबाद, दि. १९ : काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, असा अजब दावा पाकिस्तानने केला आहे. उरी हल्ल्यानंतरच्या भारताच्या कडवट आणि निराधार आरोपातून हेच सिद्ध होते, असा जावईशोधही पाकिस्तानने लावला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी हे मत व्यक्त केले आहे. सरताज अजीज म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर भारताकडून आलेल्या प्रतिक्रिया आम्ही गांभीर्याने घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेले निराधार आणि बेजबाबदार आरोप पाकिस्तानने फेटाळले आहेत.

हिज्बुलचा कमांडर बुऱ्हाण वाणी याच्या मृत्यूनंतर झपाट्याने बिघडणाऱ्या काश्मिरातील मानवाधिकारांच्या स्थितीपासून लक्ष विचलित करण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे. अजीज म्हणाले की, काश्मिरातील परिस्थिती पाकिस्तानने तयार केलेली नाही. अवैध भारतीय कब्जा आणि अत्याचाराच्या दीर्घ इतिहासाने काश्मिरात हजारो नागरिकांचे बळी गेलेले आहेत. सरकारी बळाचा वापर करून महिला, मुले, हॉस्पिटलमधील जखमी, वृद्ध यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाने आता जागे व्हायला हवे. दरम्यान, पाकिस्तान दहशतवादी देश आहे, या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना अजीज म्हणाले की, चौकशीपूर्वीच पाकिस्तानला दोष देणे निंदनीय आहे. व्हेनेझुएला येथे होत असलेल्या अलिप्तवादी गटांच्या शिखर संमेलनात पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत असलेले अजीज म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या घोषणापत्रानुसार काश्मीर मुद्यावर तोडगा काढल्याशिवाय दक्षिण आशियात शांतता स्थापन होणार नाही.