शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तैवानमध्ये आता पाण्याचे होणार रेशनिंग

By admin | Updated: April 9, 2015 00:37 IST

भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे

तैपेई : भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. तब्बल १० लाख कुटुंबांची तहान भागविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. दर आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. तैवानच्या उत्तरेकडील अनेक शहरांत आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने जलाशयातील साठ्याने तळ गाठला आहे. तैवानमध्ये यंदा जलसाठ्याने तळ गाठला आहे. देशात यंदा १९४७ नंतरचा सर्वांत कमी पाऊस झाला आहे, असे तैवानच्या अर्थ व्यवहार मंत्रालयाने सांगितले. नागरिकांनी अशा बिकट वेळी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारने केले आहे. राजधानी तैपेई वगळता उत्तरेकडील जवळपास सर्वच शहरांत भीषण पाणीटंचाई आहे. उत्तरेकडील शहरांना पाणीपुरवठा होणाऱ्या शिहमेन जलाशयातील साठा एकूण क्षमतेच्या २४.५६ टक्क्यांवर आला आहे. १९६४ नंतर प्रथमच या जलाशयाने ही पातळी गाठली आहे. प्रशासनाने नागरिकांना स्वयंपाक, अंघोळ आणि स्वच्छतेसाठी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाणीटंचाईचा औद्योगिक व रासायनिक कंपन्यांनाही फटका बसला आहे. सुमारे १,४०० कंपन्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून औद्योगिक पाणी वापरासाठी काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)