शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेसाठी शरीफ नरमले

By admin | Updated: November 29, 2015 03:38 IST

प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी पाकिस्तान भारताशी बिनशर्त चर्चेस तयार आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.

वालेटा (माल्टा) : प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी पाकिस्तान भारताशी बिनशर्त चर्चेस तयार आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.पाकचे पंतप्रधान शरीफ राष्ट्रकुल देशांच्या संमेलनासाठी माल्टात आले आहेत. राजधानी वालेटात त्यांनी शुक्रवारी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांची भारत-पाक संबंधांवर चर्चा झाली. चर्चेदरम्यान शरीफ यांनी भारताशी बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव ठेवला. शरीफ म्हणाले की, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाची निर्भत्सना करतो. आम्ही देशातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवत आहोत. शरीफ यांनी पॅरिस हल्ल्याचा यावेळी निषेध केला. ते म्हणाले की, पाकिस्तानी लष्कराची दहशतवाद्यांविरुद्धची जर्ब-ए-अज्ब ही मोहीम आता अंतिम टप्प्यात असून या मोहिमेमुळे देशातील एकूण एक दहशतवाद्यांचा नायनाट होईल. (वृत्तसंस्था)ब्रिटिश पंतप्रधान कॅमेरून यांनी दहशतवाद आणि कट्टरवादाच्या उच्चाटनासाठी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांची रशियात भेट झाल्यानंतर उभय देशातील चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाकने फुटीरवाद्याशी चर्चा केल्यामुळे परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा ऐनवेळी रद्द झाली. त्यानंतर सीमेवरील तणाव आदी कारणांमुळे उभय देशातील तणाव कायम राहिला.प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाची निर्भत्सना करतो. आम्ही देशातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवत आहोत. - नवाज शरीफ