शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सलाम मलालाला अन् सत्यार्थींना

By admin | Updated: October 11, 2014 04:26 IST

रेल्वेच्या प्रवासात त्याला एका बालकाच्या पाठीवर एक भलीमोठी बॅग दिसली...वीटभट्टीवर काही मुले हाताला चटके बसत असताना भर उन्हात कामे करत होती..

मानवाधिकाराचा पुरस्कार करणा-या  आणि मानवी मूल्यांचा आदर करणाऱ्या जगातील प्रत्येकासाठी आनंदाची बातमी म्हणजे- ‘मलालाला नोबेल!’ आपल्या वयाच्या मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी आपले बालपण विसरून चिमुकल्या मुठी आवळून लढा देणाऱ्या मलाला युसुफजाई हिच्या कार्याची अखेर ‘नोबेल’ने दखल घेतली आहे. मागच्या वर्षी या पुरस्काराने तिला हुलकावणी दिली होती. पाकिस्तानमधील स्वात खोऱ्यातील ही मुलगी आता फक्त सतरा वर्षांची आहे. नऊ-दहा वर्षांची असल्यापासून तिचा हा लढा सुरू आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी सीमेवरील स्वात खोऱ्यात आपले बस्तान बसवले. धार्मिक संदेश देता देताच त्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी आणली. स्त्रिया आणि मुलींना बाजारपेठेत जाण्यावर बंधने घातली. याविरोधात एकटी मलाला उभी ठाकली. अर्थात तिच्या आई-वडिलांनी घालून दिलेल्या संस्कारांचा यात मोठा वाटा होता. शाळा ओस पडत होत्या. लहान मुलांच्या भाषेत सांगायचे तर शाळांना सुट्या लागल्या होत्या. खरं तर सुट्या म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणी असते. पण या सुट्या आनंद देणाऱ्या नव्हत्या. शाळा पुन्हा केव्हा सुरू होतील, हे शिक्षकांनाही ठाऊक नव्हते. पुन्हा आपण शाळेत जाऊ की नाही, या भीतीने मलालाच्या मनात घर केले होते. मलालाने तालिबानींच्या फतव्याविरोधात आवाज उठवला. ती घरोघरी जाऊन मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ लागली. मुलींचे मन वळवू लागली. तिने याच काळात ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावर उर्दूतून डायरी लिहायला सुरुवात केली. तब्बल ३८ वेळा तिने स्वात खोऱ्यातील अनुभव मांडून तालिबानींचा खरा चेहरा जगासमोर आणला. यासाठी तिने ‘गुलमकई’ हे टोपणनाव धारण केले. तिने मुलींच्या शिक्षणासाठी ‘मलाला फाउंडेशन’ची स्थापना केली. अँजेलिना जोलीसारख्या काही मान्यवरांनी तिला मदतीचा हात पुढे केला. प्रसारमाध्यमांनीही तिच्या कार्याची दखल घेतली. तिला आणि तिच्या वडिलांना तालिबानींच्या धमक्या येऊ लागल्या; पण ती डगमगली नाही. ती म्हणायची, ‘तालिबानींना ठाऊकच नाही, की पुस्तकात काय लिहिले आहे; नाही तर त्यांनी शाळा बंद केल्या नसत्या.’ दोन वर्षांपूर्वी म्हणजे ९ आॅक्टोबर २०१२ रोजी ती शाळेतून परत येत असताना तालिबानींनी तिच्या डोक्यात गोळ्या घातल्या. इच्छाशक्तीच्या बळावर आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिचा पुनर्जन्म झाला. ती नव्या उत्साहाने उभी राहिली. ध्येयापासून जराही ढळली नाही. ती अधिकच धैर्यवान आणि धाडसी झाली. शांततेसाठी जाहीर झालेला नोबेल पुरस्कार हा तिच्या याच कार्याला केलेला सलाम होय. रेल्वेच्या प्रवासात त्याला एका बालकाच्या पाठीवर एक भलीमोठी बॅग दिसली...वीटभट्टीवर काही मुले हाताला चटके बसत असताना भर उन्हात कामे करत होती...भल्यामोठ्या इमारतीचे मजले चढून मुले डोक्यावर बांधकामाचे साहित्य उचलून नेत होती.. भोपाळच्या विषारी वायू घटनेत कोवळ््या जिवांचे झालेले हाल आणि त्यानंतर एका स्मशानात मुले लाकडे उचलताना त्याने पाहिले आणि क्षणभराचाही विराम न घेता त्याने नोकरीचा राजीनामा दिला.२४ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग, त्याच्या मनावर कोरला..आणि चिकाटी, अपार कष्टाच्या तयारीच्या जोरावर एक सत्य प्रत्यक्षात आले. जगाने त्याच्या कष्टाचे चिज केले. कैलाश सत्यार्थी त्याचे नाव. वयाने आता साठीत प्रवेश केला असला तरी धडपड विशीच्या युवकाला मागे टाकेल अशी. एरवी लहान बालकांच्या उत्कर्षासाठी त्याहीपेक्षा बालमजुरीच्या व्याधीने गंज धरलेल्या समाजाला तो जागल्याचे काम करतो, हीच त्याची ओळख असे. सरकारशी त्याचा संघर्ष कायम ठरलेला. बालमजुरीच्या नायनाटासाठी सरकारविरूद्ध तब्बल ४० याचिका त्याने देशभरातील न्यायालयांत दाखल केल्या आहेत. मुलांमधील कौशल्य तो शोधून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नेहमी आग्रही असतो. त्यांच्यासाठी योजना शोधतो, मुलांवर जबरदस्ती करणाऱ्यांना धडा मिळावा म्हणून जनतेला एकत्रित करतो. आजचा दिवस उजाडला आणि या नावाने जगावर नाव कोरले. शांततेसाठी दिले जाणारे नोबेल त्यांना जाहीर झाले आणि ३४ वर्षांपासूनच्या त्यांच्या चळवळीला यशाची लखलखती किनार लाभली. विदिशाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. प्रारंभी सरकारी व नंतर एका मोठ्या खासगी कंपनीत त्यांनी नोकरी केली. दौरे करत असताना त्यांना पालकांचे छत्र नसलेल्या बालकांच्या चेहऱ्यावरील लोपलेले हास्य गलबलून टाकत असे. नोकरीत असूनही त्यांनी त्याविरूद्ध लढा उभारला. पण समाधान मिळत नव्हते. पुढे राजीनामा देऊन बालकांच्या हक्कासाठी चळवळ उभारायचे ठरविले. त्यांनी काहींना याबाबत सांगितले. काहींना मदत केली, तर अनेकांनी मुलांपेक्षा इतरही प्रश्न आपल्यापुढे आहेत, असे सांगून त्यांचा हिरमोडही केला. पहिली सात वर्षे त्यांना मार्ग सापडत नव्हता. पण मुलांच्या हितासाठी पोलीसांपासून बाल्यगृहापर्यंतचे लढे सुरूच होते. ९०मध्ये ‘बचपन बचाओ आंदोलन’नावाने चळवळ सुरू केली. रेल्वेस्टेशन ते वीटभट्टी एवढेच नव्हें तर वेश्यावस्तीतील आयुष्य कोमेजलेल्या लहानग्यांना वस्तीजवळील शाळेत दाखल केले. प्रत्येकाच्या वहीवर एक वाक्य होते, मी तुझा मित्र आहे. आणि त्याखाली एका गाण्याचे बोललिहून होते,‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्टी में क्या है...’