शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

परस्परांच्या सार्वभौमत्वाचा सर्वांनी आदर करावा : शी

By admin | Updated: May 15, 2017 00:19 IST

सर्व दक्षिण आशियाई देशांना व्यापारी मार्गांनी जोडण्याच्या चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ (बीआरएफ) या महत्त्वाकांक्षी योजनेवर चीनने आयोजित केलेली दोनदिवसांची

बीजिंग : सर्व दक्षिण आशियाई देशांना व्यापारी मार्गांनी जोडण्याच्या चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ (बीआरएफ) या महत्त्वाकांक्षी योजनेवर चीनने आयोजित केलेली दोनदिवसांची शिखर परिषद रविवारी येथे सुरू झाली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उद््घाटनाच्या भाषणात प्रत्येक देशाने इतरांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व, आगळी वेगळी संस्कृती आणि आशा-आकांक्षांचा आदर करण्यावर भर दिला. भारताने सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करून या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर शी यांनी वरील मत व्यक्त केले. आपल्या उद्घाटकीय भाषणात चीनचा दृष्टिकोन मांडताना शी यांनी प्राचीन रेशीम मार्गाचा संदर्भ दिला. त्यांनी सिंधू तसेच गंगा संस्कृतीसह विविध संस्कृतींचाही उल्लेख केला. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवरील भारताच्या आक्षेपांचा संदर्भ न देता शी म्हणाले की, सर्व देशांनी परस्परांंचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता यांचा आदर केला पाहिजे. हा कॉरिडॉर आपल्यासाठी सार्वभौमत्वाच्या काळजीचे कारण बनणार असल्याचे सांगून भारताने या परिषदेत भाग घेतला नाही. हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मिरातून जाणार आहे. बीजिंगमध्ये होत असलेल्या या परिषदेत २९ देशांचे नेते सहभागी झाले आहेत. बेल्ट अ‍ॅण्ड रोड योजनेत भाग घेत असलेल्या देशांचा छोटा गट बनविण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे. तो फेटाळून लावताना शी म्हणाले की, शांततेचा मार्ग बनविण्याची चीनची योजना आहे. (वृत्तसंस्था)बीजिंग : चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अ‍ॅण्ड रोड शिखर परिषदेवर बहिष्कार टाकून भारताने पाकव्याप्त काश्मिरातून जाणाऱ्या वादग्रस्त चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला असलेला आपला विरोध नव्या उंचीवर नेला. भारताने या परिषदेत सहभागी व्हावे यासाठी चीनने सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र भारत ठाम राहिला. भारताच्या बहिष्काराचे पाकिस्तानने लगेच भांडवल केले. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडार हा या भागातील सर्व देशांसाठी खुला असलेला आर्थिक प्रकल्प असून, त्याचे निश्चितपणे राजकारण केले जाऊ नये, असे म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतावर टीका केली. भारताचा एकही अधिकारी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित नव्हता.