शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
3
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
4
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
5
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
6
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
7
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
8
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
9
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
10
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
11
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
12
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
13
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
14
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
15
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
16
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
17
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
18
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
19
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
20
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा

वाचाळांच्या बंदोबस्तासाठी ‘मोदीं’वर दबाव आणा

By admin | Updated: May 1, 2015 01:51 IST

भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांकडून होणारे ‘हिंसक हल्ले, बळजबरीचे धर्मांतर’ आणि घरवापसी मोहिमांना तोंड द्यावे लागत आहे,

वॉशिंग्टन : भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांकडून होणारे ‘हिंसक हल्ले, बळजबरीचे धर्मांतर’ आणि घरवापसी मोहिमांना तोंड द्यावे लागत आहे, असे अमेरिकी काँग्रेस आयोगाच्या अहवालात म्हटले.अल्पसंख्याकांबद्दल अवमानकारक टिपणी करणाऱ्या धार्मिक व राजकीय नेत्यांचे जाहीररीत्या कान टोचावेत, यासाठी ओबामा प्रशासनाने भारत सरकारवर दबाव आणावा, असेही यात सुचविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाचा २०१५चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या मानकांना चालना देण्याचा तेथील सरकारने प्रयत्न करावा, असे यात म्हटले आहे. ‘भारताची बहुसांस्कृतिक व सामाजिक लोकशाही अशी प्रतिमा असली तरी दीर्घकाळापासून अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी किंवा गुुन्ह्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत झगडत आहे. धार्मिक हिंसाचार, धार्मिक उद्देशाने प्रेरित घटनांच्या संख्येत वाढ होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्याचेही अहवालात म्हटले. निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपशी संबंधित नेते अल्पसंख्याक समुदायांबाबत अवमानकारक वक्तव्ये करत आहेत, तसेच अल्पसंख्याकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेसारख्या हिंदू राष्ट्रवादी संघटनांकडून होणारे बळजबरीचे धर्मांतर आणि हिंसक हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये हिंदू संघटनांनी घर वापसी कार्यक्रमांतर्गत उत्तर प्रदेशात ४००० ख्रिश्चन कुटुंबे व एक हजार मुस्लिम कुटुंबियांना बळजबरीने पुन्हा हिंदू करण्याची घोषणा केली होती. (वृत्तसंस्था) एक मुस्लिम व एका ख्रिश्चन धर्मीयाला पुन्हा हिंदू बनविण्यासाठी प्रति व्यक्ती दोन ते पाच लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगून या हिंदू संघटनांनी या कार्र्यक्रमापूर्वी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, देशातून तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र टीका होऊ लागल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, असे संघाचे नेते मोहन भागवत यांनी म्हटले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ४आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानात धार्मिक उद्देशाने प्रेरित हल्ले आणि हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. ४२०१४च्या निवडणुकीपूर्वीच धर्माच्या आधारावर भेदाभेद निर्माण करण्याची मोहीम सुरू झाली होती. मुस्लिम, ख्रिश्चन व शीख समुदायांसह इतर धार्मिक नेते आणि बिगरसरकारी संघटनांनीही या मोहिमेला हातभार लावला.