शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चर्चेच्या यशाबद्दल पाक माध्यमे साशंक

By admin | Updated: May 29, 2014 04:22 IST

पाक प्रसारमाध्यमे मात्र दौरा यशस्वी ठरला किंवा नाही, याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावून आंतरराष्टÑीय पात

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत दौर्‍याबाबत पाक सरकार आशावादी असले, तरीही पाक प्रसारमाध्यमे मात्र दौरा यशस्वी ठरला किंवा नाही, याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावून आंतरराष्टÑीय पातळीवर स्वत:ची सकारात्मक प्रतिमा बनवली; पण त्यापेक्षा जास्त काही साध्य झाले नाही, असा प्रसारमाध्यमांचा सूर आहे. पाक - भारत बहुतांश मुद्दे जुनेच या मथळ्याखाली डॉन वृत्तपत्राने या दौर्‍याचे विश्लेषण केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वीच शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी पावले उचलली व यात सुरक्षेचा जुना मुद्दा बाजूला पडला. शरीफ यांनी दिल्लीत फील गुड या घटकाचा चांगला वापर केला, असे डॉनने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरीफ यांच्या भेटीची छायाचित्रे भारतीय प्रसारमाध्यमांनी वापरली; पण या भेटीतील चर्चेत अधिक स्पष्टता हवी होती, असे भारतीय जनतेचे मत होते. भारताला दहशतवादावर अधिक भर देण्याची इच्छा आहे, तर पाकिस्तानला जुन्या समस्या सोडवाव्यात असे वाटते, असे या संपादकीयात म्हटले आहे. दोन्ही पंतप्रधानांनी शांततेचा जुनाच राग आळवला आहे; पण ते खरेच शक्य आहे काय? असा प्रश्न या लेखात विचारण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानशी सुरळीत संबंध ठेवण्याची इच्छा खरोखर आहे काय? त्यासाठी ते पुढाकार घेतील काय? असाही प्रश्न येथे विचारण्यात आला आहे. नवाज शरीफ यांना भारतात बोलावून मोदी यांनी चांगुलपणा मिळवला आहे; पण त्यापेक्षा जास्त काहीही या भेटीतून मिळालेले नाही. द नेशन या इंग्रजी वृत्तपत्राने नेहमीप्रमाणे काठावर असा मथळा संपादकीयाला दिला आहे. शरीफ यांचा दिल्ली दौरा ही एक स्मार्ट राजकीय चाल होती. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी लाहोरपर्यंत शांतता फेरी काढली होती, याची आठवण करून देत या वृत्तपत्राने फक्त संकेतापेक्षा आणखी काही करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवले व त्यानंतर शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह सार्क नेत्यांना शपथविधीसाठी बोलावले ही मोदी यांची एक हुशार खेळी आहे; पण आता राजकारणही बदलावे अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असे या संपादकीयात म्हटले आहे. द न्यूजने ए न्यू पेज असा मथळा दिला असून, शरीफ यांच्या या भेटीतून फारसे काही अपेक्षित करणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान मोदी जर पाकिस्तानला आले तर आम्ही गुजरातमधील हत्याकांडाचा विषय काढू, असेही या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)