शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेच्या यशाबद्दल पाक माध्यमे साशंक

By admin | Updated: May 29, 2014 04:22 IST

पाक प्रसारमाध्यमे मात्र दौरा यशस्वी ठरला किंवा नाही, याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावून आंतरराष्टÑीय पात

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत दौर्‍याबाबत पाक सरकार आशावादी असले, तरीही पाक प्रसारमाध्यमे मात्र दौरा यशस्वी ठरला किंवा नाही, याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावून आंतरराष्टÑीय पातळीवर स्वत:ची सकारात्मक प्रतिमा बनवली; पण त्यापेक्षा जास्त काही साध्य झाले नाही, असा प्रसारमाध्यमांचा सूर आहे. पाक - भारत बहुतांश मुद्दे जुनेच या मथळ्याखाली डॉन वृत्तपत्राने या दौर्‍याचे विश्लेषण केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वीच शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी पावले उचलली व यात सुरक्षेचा जुना मुद्दा बाजूला पडला. शरीफ यांनी दिल्लीत फील गुड या घटकाचा चांगला वापर केला, असे डॉनने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरीफ यांच्या भेटीची छायाचित्रे भारतीय प्रसारमाध्यमांनी वापरली; पण या भेटीतील चर्चेत अधिक स्पष्टता हवी होती, असे भारतीय जनतेचे मत होते. भारताला दहशतवादावर अधिक भर देण्याची इच्छा आहे, तर पाकिस्तानला जुन्या समस्या सोडवाव्यात असे वाटते, असे या संपादकीयात म्हटले आहे. दोन्ही पंतप्रधानांनी शांततेचा जुनाच राग आळवला आहे; पण ते खरेच शक्य आहे काय? असा प्रश्न या लेखात विचारण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानशी सुरळीत संबंध ठेवण्याची इच्छा खरोखर आहे काय? त्यासाठी ते पुढाकार घेतील काय? असाही प्रश्न येथे विचारण्यात आला आहे. नवाज शरीफ यांना भारतात बोलावून मोदी यांनी चांगुलपणा मिळवला आहे; पण त्यापेक्षा जास्त काहीही या भेटीतून मिळालेले नाही. द नेशन या इंग्रजी वृत्तपत्राने नेहमीप्रमाणे काठावर असा मथळा संपादकीयाला दिला आहे. शरीफ यांचा दिल्ली दौरा ही एक स्मार्ट राजकीय चाल होती. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी लाहोरपर्यंत शांतता फेरी काढली होती, याची आठवण करून देत या वृत्तपत्राने फक्त संकेतापेक्षा आणखी काही करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवले व त्यानंतर शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह सार्क नेत्यांना शपथविधीसाठी बोलावले ही मोदी यांची एक हुशार खेळी आहे; पण आता राजकारणही बदलावे अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असे या संपादकीयात म्हटले आहे. द न्यूजने ए न्यू पेज असा मथळा दिला असून, शरीफ यांच्या या भेटीतून फारसे काही अपेक्षित करणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान मोदी जर पाकिस्तानला आले तर आम्ही गुजरातमधील हत्याकांडाचा विषय काढू, असेही या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)