शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेच्या यशाबद्दल पाक माध्यमे साशंक

By admin | Updated: May 29, 2014 04:22 IST

पाक प्रसारमाध्यमे मात्र दौरा यशस्वी ठरला किंवा नाही, याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावून आंतरराष्टÑीय पात

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत दौर्‍याबाबत पाक सरकार आशावादी असले, तरीही पाक प्रसारमाध्यमे मात्र दौरा यशस्वी ठरला किंवा नाही, याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावून आंतरराष्टÑीय पातळीवर स्वत:ची सकारात्मक प्रतिमा बनवली; पण त्यापेक्षा जास्त काही साध्य झाले नाही, असा प्रसारमाध्यमांचा सूर आहे. पाक - भारत बहुतांश मुद्दे जुनेच या मथळ्याखाली डॉन वृत्तपत्राने या दौर्‍याचे विश्लेषण केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वीच शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी पावले उचलली व यात सुरक्षेचा जुना मुद्दा बाजूला पडला. शरीफ यांनी दिल्लीत फील गुड या घटकाचा चांगला वापर केला, असे डॉनने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरीफ यांच्या भेटीची छायाचित्रे भारतीय प्रसारमाध्यमांनी वापरली; पण या भेटीतील चर्चेत अधिक स्पष्टता हवी होती, असे भारतीय जनतेचे मत होते. भारताला दहशतवादावर अधिक भर देण्याची इच्छा आहे, तर पाकिस्तानला जुन्या समस्या सोडवाव्यात असे वाटते, असे या संपादकीयात म्हटले आहे. दोन्ही पंतप्रधानांनी शांततेचा जुनाच राग आळवला आहे; पण ते खरेच शक्य आहे काय? असा प्रश्न या लेखात विचारण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानशी सुरळीत संबंध ठेवण्याची इच्छा खरोखर आहे काय? त्यासाठी ते पुढाकार घेतील काय? असाही प्रश्न येथे विचारण्यात आला आहे. नवाज शरीफ यांना भारतात बोलावून मोदी यांनी चांगुलपणा मिळवला आहे; पण त्यापेक्षा जास्त काहीही या भेटीतून मिळालेले नाही. द नेशन या इंग्रजी वृत्तपत्राने नेहमीप्रमाणे काठावर असा मथळा संपादकीयाला दिला आहे. शरीफ यांचा दिल्ली दौरा ही एक स्मार्ट राजकीय चाल होती. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी लाहोरपर्यंत शांतता फेरी काढली होती, याची आठवण करून देत या वृत्तपत्राने फक्त संकेतापेक्षा आणखी काही करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवले व त्यानंतर शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह सार्क नेत्यांना शपथविधीसाठी बोलावले ही मोदी यांची एक हुशार खेळी आहे; पण आता राजकारणही बदलावे अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असे या संपादकीयात म्हटले आहे. द न्यूजने ए न्यू पेज असा मथळा दिला असून, शरीफ यांच्या या भेटीतून फारसे काही अपेक्षित करणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान मोदी जर पाकिस्तानला आले तर आम्ही गुजरातमधील हत्याकांडाचा विषय काढू, असेही या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)