शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

पाकिस्तान म्हणतो भारतासोबत चर्चेला तयार, पण....

By admin | Updated: March 23, 2017 17:20 IST

भारतासोबत करण्यात येत असलेली चर्चेची मागणी आमचा दुबळेपणा नसून आमची ताकद आहे असं अब्दुल बसित बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी कोणत्याही वेळेची किंवा घटनेची गरज नसते. वेळ आणि क्षण कोणताही असो, काश्मीरचा मुद्दा आलाच पाहिजे. पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'काश्मीर लोकांच्या इच्छेप्रमाणे यावर तोडगा काढला पाहिजे', असं मत व्यक्त केलं आहे. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले आहेत. 'काश्मीर मुद्यासहित इतर मुद्देही चर्चेच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत', असंही ते बोलले आहेत. 
 
पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ध्वजरोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतासोबत करण्यात येत असलेली चर्चेची मागणी आमचा दुबळेपणा नसून आमची ताकद आहे असं अब्दुल बसित बोलले आहेत. बासित यांनी यावेळी सांगितलं की, 'द्विपक्षीय मुद्यांवर पाकिस्तानची मुळं आंतरराष्ट्रीय कायद्याशी जोडली गेली आहेत. शांतता प्रस्थापित करणं हेच आमचं धोरण आहे. खासकरुन आशियामध्ये आम्ही शेजारी राष्ट्रांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो'.
 
काश्मीर मुद्याचा उल्लेख करताना बासित बोलले आहेत की, 'जिथपर्यंत जम्मू आणि काश्मीर मुद्द्याचा प्रश्न आहे, तो काश्मीरमधील लोकांच्या इच्छेप्रमाणे सोडवला गेला पाहिजे आणि असंच होईल अशी आमची आशा आहे'. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले. 'काश्मीर लोक जे संघर्ष करत आहेत, त्यात त्यांना यश मिळो', असं बासित यांनी म्हटलं आहे.
 
'शांततेत दोन्ही देशांचं हित लपलं असून शांततेच्या मार्गानेच स्थायी शांतता आणली जाऊ शकते', असं मत बासित यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.