शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पाकिस्तान म्हणतो भारतासोबत चर्चेला तयार, पण....

By admin | Updated: March 23, 2017 17:20 IST

भारतासोबत करण्यात येत असलेली चर्चेची मागणी आमचा दुबळेपणा नसून आमची ताकद आहे असं अब्दुल बसित बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी कोणत्याही वेळेची किंवा घटनेची गरज नसते. वेळ आणि क्षण कोणताही असो, काश्मीरचा मुद्दा आलाच पाहिजे. पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'काश्मीर लोकांच्या इच्छेप्रमाणे यावर तोडगा काढला पाहिजे', असं मत व्यक्त केलं आहे. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले आहेत. 'काश्मीर मुद्यासहित इतर मुद्देही चर्चेच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत', असंही ते बोलले आहेत. 
 
पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ध्वजरोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतासोबत करण्यात येत असलेली चर्चेची मागणी आमचा दुबळेपणा नसून आमची ताकद आहे असं अब्दुल बसित बोलले आहेत. बासित यांनी यावेळी सांगितलं की, 'द्विपक्षीय मुद्यांवर पाकिस्तानची मुळं आंतरराष्ट्रीय कायद्याशी जोडली गेली आहेत. शांतता प्रस्थापित करणं हेच आमचं धोरण आहे. खासकरुन आशियामध्ये आम्ही शेजारी राष्ट्रांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो'.
 
काश्मीर मुद्याचा उल्लेख करताना बासित बोलले आहेत की, 'जिथपर्यंत जम्मू आणि काश्मीर मुद्द्याचा प्रश्न आहे, तो काश्मीरमधील लोकांच्या इच्छेप्रमाणे सोडवला गेला पाहिजे आणि असंच होईल अशी आमची आशा आहे'. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले. 'काश्मीर लोक जे संघर्ष करत आहेत, त्यात त्यांना यश मिळो', असं बासित यांनी म्हटलं आहे.
 
'शांततेत दोन्ही देशांचं हित लपलं असून शांततेच्या मार्गानेच स्थायी शांतता आणली जाऊ शकते', असं मत बासित यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.