शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ

By admin | Updated: January 20, 2016 15:46 IST

पाकिस्तानी लष्कराने वाढवलेला तालिबानी संघटनेचा ग्रुप आता त्यांच्यावरच उलटला असून बचा खान विदयापीठ हल्ल्यानंतर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - अफगाणिस्तानवर नियंत्रण  रहावे यासाठी पाकिस्तानी लष्कराने वाढवलेला तालिबानी संघटनेचा ग्रुप आता त्यांच्यावरच उलटला असून बचा खान विदयापीठ हल्ल्यानंतर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे मत परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.
 
त्यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे:
 
'पाकिस्तानला एक कडवा इस्लामिक देश बनवणे तसेच पाकिस्तानच्या तुरूंगात खितपत पडलेल्या 'तहरीक-ए-तालिबान' या संघटनेतील अनेक दहशतवाद्यांची मुक्तता करणे' या दोन प्रमुख मागण्या करत 'तहरीक-ए-तालिबान' या संघटनेची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची २००९ पासून चर्चा सुरू आहे. मात्र ती सतत अपयशी ठरत असल्याने ही संघटना व पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध सुरू होतं. आज पेशावरमधील युनिव्हर्सिटीवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारीही याच संघटनेने घेतली आहे. यापूर्वी त्यांनी गेल्यावर्षी लष्करी शाळेवर हल्ला करत लष्करी अधिका-यांच्या शेकडो मुलांना निर्घृणपणे ठार मारले होते. 
१५ जून २०१५मध्ये नवाज शरीफ यांनी या संघटनेविरोधात एका लष्करी मोहिमेची घोषणा केली. पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमारेषेला लागून असलेल्या 'फटा' (Federally Administered Tribal Area) या प्रदेशात तहरीक-ए-तालिबान वा धार्मिक मूलतत्ववादी संघटनांचे फार मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून पाकिस्तानने या क्षेत्रावर लष्करी कारवाई केली. गेल्या वर्षभरात पाकिस्तानचे जवळपास ४० हजार सैन्य या भागात असून त्यांनी ग्राऊंड लेव्हलवर कारवाई करत अनेक अतिरेक्यांना मारले आणि हवाई हल्ल्यांसाठी अमेरिकेची मदत घेतली. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तहरिक-ए-तालिबान संघटनेतील अनेक लहान मुले व स्त्रिया मारल्या गेल्या आणि त्याचाच सूड उगवण्यासाठी या संघटनेने गेल्या वर्षी लष्कराच्या शाळेवर आणि आज विद्यापीठावर दहशतवादी हल्ला करत लहान मुलांना, विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. 
पाकिस्तानने लष्करी कारवाई थांबवावी, चर्चा करावी आणि तहरीकच्या अतिरेक्यांना तुरूंगातून सोडावे ही तालिबाची मुख्य मागणी असून ते अशा कारवाया करून पाकिस्तावर दबाव आणत आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. दहशतवादासंदर्भात पाकिस्तानचे एकंदर धोरण दुटप्पी असून अफगाणिस्तानच्या राजकारणावर आपलं नियंत्रण व प्रभाव रहावा म्हणून पाकिस्तानच्या लष्करानेच हा तालिबानचा ग्रुप वाढवला, मात्र आता तोच त्यांच्यावर उलटला आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनता, राजकारणी व लष्कराने आता आत्मपरीक्षण करून दहशतवादाविरोधात ठामपणे उभं राहण्याची वेलव आली आहे.
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर ( परराष्ट्र धोरण विश्लेषक)