शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र, भारताने फटकारले

By admin | Updated: September 28, 2016 01:20 IST

पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने मंगळवारी पाकिस्तानला फटकारले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे हे त्याला मोठ्या आणि स्पष्ट आवाजात सांगणे आवश्यक आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव इनाम गंभीर म्हणाल्या.पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत मिळत असतानाही त्या देशात दहशतवादाची भरभराट का होत आहे याचे स्पष्टीकरण पाकिस्तान करू शकते का, असे गंभीर म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी दूत मलिहा लोधी यांनी प्रतिउत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी केलेल्या भाषणाला उत्तर दिले. त्यांनी स्वराज यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे आणि काश्मीर हा कधीही भारताचे अविभाज्य अंग नव्हते व नसेल, असे नमूद केले. (वृत्तसंस्था)