शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाकिस्तान तोंडघशी!

By admin | Updated: September 23, 2016 06:34 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रात पूर्णत: तोंडघशी पडले असून, काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रात पूर्णत: तोंडघशी पडले असून, काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी थेट फेटाळूनच लावली आहे. पाकिस्तानसाठी हा मोठाच झटका आहे.नवाझ शरीफ यांनी काश्मीरमध्ये भारत सरकारतर्फे मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्येच त्यांना सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तान हा दहशतवादी देश असून, दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानचे जे जुने धोरण आहे त्यातून पाकिस्तान भारताविरोधात युद्धसदृश गुन्हे करीत आला आहे, असे भारताने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केले आहे असे दहशतवादी पाकिस्तानच्या रस्त्यांवर राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याने उघडपणे फिरत आहेत आणि त्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान मदत करीत आहे, असे भारताने म्हटले आहे. मानवी हक्काचे सर्वांत वाईट उल्लंघन कुठले असेल तर तो दहशतवाद आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम सचिव इनाम गंभीर म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीच्या स्वरुपात मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सचा उपयोग पाकिस्तानकडून तेथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी केला जात असल्यामुळेच पाकिस्तानला आम्ही दहशतवादी देश मानतो, असे भारताने स्पष्ट केले.हस्तक्षेपाची मागणी फेटाळून लावताना, भारत आणि पाकिस्तानने परस्परांशी चर्चा करुन काश्मीरसह अन्य वादांवर तोडगा शोधावा, असा सल्ला बान की मून यांनी नवाझ शरीफ यांना दिला. बान की मून यांनी हस्तक्षेपाची मागणी फेटाळल्यानंतरही शरीफ यांनी मून यांच्या वक्तव्यांचे स्वागत केले. काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवण्याची गरज आहे, असे सांगून भारताने चचेर्साठी अनावश्यक अटी ठेवल्याची तक्रार त्यांनी केली. काश्मीरचा मुद्दा सोडवला जात नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानात शांतता नांदणार नाही, असाच जुनाच सूर त्यांनी आळवला.विमानसेवा खंडित?भारतीय लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून २0 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि त्या वेळी अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त एका वेबसाइटने दिले होते. केंद्र सरकारकडून वा लष्कराच्या कोणत्याही सूत्रांकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. मात्र या वृत्तानंतर पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्सनं उत्तर पाकिस्तानमधल्या शहरांतील विमानसेवा रद्द केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली गिलगिट आणि स्कर्डूची सेवा खंडित केल्याची माहिती त्या वेबसाइटने दिली आहे.