शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारताचे NSG सदस्यत्व कार्यक्रमपत्रिकेवरही नाही - चीन

By admin | Updated: June 20, 2016 15:23 IST

एनएसजी गटात नव्या देशांच्या समावेशावरुन सदस्य देशांमध्ये मतभेद कायम असून, सेऊलमध्ये होणा-या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा विषय कार्यक्रमपत्रिकेवरही नाही.

ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. २० - एनएसजी गटात नव्या देशांच्या समावेशावरुन सदस्य देशांमध्ये मतभेद कायम असून, सेऊलमध्ये होणा-या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा विषय कार्यक्रमपत्रिकेवरही नाही असे चीनने सोमवारी सांगितले. त्यामुळे एनएसजीमध्ये भारताच्या समावेशाला चीनचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीन विरोध करणार नाही असे म्हटले होते. स्वराज यांच्या विधानानंतर काही तासातच चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्रसचिव एस.जयशंकर यांनीही चीनचे मन वळवण्यासाठी १६-१७ जूनला चीनचा दौरा केला होता. 
 
अणवस्त्रप्रसारबंदीवर स्वाक्षरी न केलेल्या देशांना समावेश देण्यावरुन एनएसजीमध्ये मतभेद आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. २४ जूनला एनएसजी देशांची दक्षिण कोरिया येथे बैठक होणार आहे. 
 
या संघटनेत एकूण ४८ देश आहेत. इथे मतदान घेऊन बहुमताने निर्णय होत नाही. सर्व सदस्य देशांचे एकमत असेल तरच, नव्या सदस्याला प्रवेश दिला जातो. अणवस्त्रप्रसार बंदी या संघटनेचा मूळ हेतू आहे. भारताने या करारावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. भारत आणि पाकिस्तान दोघांनीही सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. अमेरिकेचा भारताला तर, चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे.