शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भारताच्या सत्यार्थींना नोबेल

By admin | Updated: October 11, 2014 06:24 IST

या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे.

ओस्लो : गेल्या तीन दशकांहून जास्त काळ बालहक्क संरक्षणासाठी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झटणारे गांधीवादाचे पाईक कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानातील तालिबानी हल्ल्यातून बचावल्यानंतर बालहक्क आणि मुलींच्या शिक्षणाला वाहून घेणारी मलाला युसूफझई यांना शांततेसाठीचा २०१४चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या वाट्याला एकाचवेळी हा सन्मान आला आहे. साठीच्या घरातील सत्यार्थी हे सर्वार्थाने भारतीय असलेले शांततेच्या नोबेलचे पहिले मानकरी, तर १७ वर्षांची मलाला या पुरस्काराची सर्वात लहान मानकरी ठरली आहे. या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे. भारतीय उपखंडात या दोघांनी बालहक्क व मुलांचे शिक्षण यासाठी केलेल्या कार्याबद्दल ही निवड झाली. सत्यार्थी यांनी भारतात मुलांची बालमजुरी व तस्करी यातून सुटका करण्यासाठी एनजीओ स्थापन केली व त्यासाठी विद्युत अभियंत्याची नोकरीही सोडून दिली. तर मलाला तालिबानने दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावली. मुलींच्या शिक्षणसाठी काम करण्याचा तिचा निर्धार आजही कायम आहे. सत्यार्थी यांच्या एनजीओने ८० हजार मुलांची बालमजुरीतून मुक्तता केली आहे. मुले व युवक यांची अत्याचारातून मुक्तता करण्यास तसेच मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी अखंड परिश्रम करणारे सत्यार्थी व मलाला यांची निवड २०१४च्या शांतता नोबेल पुरस्कारासाठी करण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला आहे, असे ज्युरींनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्यार्थी व मलाला यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले.