शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नेपाळचा आरोप प्रक्षोभक - भारत

By admin | Updated: November 4, 2015 02:00 IST

नेपाळने स्वीकारलेल्या नव्या घटनेच्या विरोधातील आंदोलनात भारत आमच्या देशात साध्या वेशातील सैनिक पाठवीत असल्याचा त्याचा आरोप भारताने तीव्र शब्दांत मंगळवारी फेटाळला.

काठमांडू : नेपाळने स्वीकारलेल्या नव्या घटनेच्या विरोधातील आंदोलनात भारत आमच्या देशात साध्या वेशातील सैनिक पाठवीत असल्याचा त्याचा आरोप भारताने तीव्र शब्दांत मंगळवारी फेटाळला. नेपाळचा हा आरोप ‘प्रक्षोभक’ आणि ‘वाईट हेतूंचा’ असल्याचे येथील भारतीय दूतावासाने म्हटले. नेपाळचे बिनखात्याचे मंत्री सत्य नारायण मंडल यांनी सोमवारी पूर्व नेपाळमधील बिरतनगर गावातील पत्रकार परिषदेत केलेल्या वरील आरोपाबद्दल दूतावासाने तीव्र शब्दांत काळजी व्यक्त केली. भारत नेपाळमध्ये साध्या वेशात सैनिक पाठवीत असल्याचा आरोप मंडल यांनी केला होता. भारत थेट लष्कर पाठवू शकत नाही म्हणून त्याचे सैनिक साध्या वेशात नेपाळमध्ये येण्याची शक्यता आहे, असा आरोप मंडल यांनी केला होता. मंडल यांचा हा आरोप निराधार, प्रक्षोभक आणि वाईट हेतूंचा आहे, असे दूतावासाने म्हटले. गेल्या सप्टेंबरमध्ये नेपाळने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष घटनेच्या विरोधात भारतीय वंशाच्या मधेसी समाजाने गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू केले.